शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

कर्डिलेंकडून अच्छे दिनची अपेक्षा

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे.

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे. बुऱ्हाणनगर येथून सरपंचपदाची सुरूवात केलेल्या कर्डिले यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली़ नगर-नेवासे मतदारसंघातून तीनदा, तर राहुरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय संपादन करून राजकीय आखाड्यात डावपेच टाकण्यात ‘हम भी कुछ कम नही’ याची प्रचिती आणून दिली़लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघाची नाडी ओळखली़ या मतदारसंघात पाथर्डी व नगरच्या गावांचा समावेश झाला तेव्हा बुऱ्हाणनगरचा हा पहिलवान अडसर ठरेल असे कुणालाही वाटले नाही़ गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी तालुक्यातून दहा हजार मताधिक्य घेणाऱ्या कर्डिले यांनी ४७ टक्के मते मिळवून मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे़आमदार म्हणून कर्डिले यांनी गेल्या पाच वर्षांत राहुरी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा लावला होता. मात्र विरोधी पक्षात असल्याने त्यांना भरीव काम करता आले नाही़ आता पुन्हा राहुरीत कमळ फुलले असून राज्यात भाजपा सत्तेवर येत असताना मतदार संघातील नागरिकांना अच्छे दिनची प्रतीक्षा आहे़ येत्या पाच वर्षांत विविध प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान कर्डिले यांच्यासमोर आहे. आमदारकीच्या कालावधीत शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक आरोप झाले़ विधानसभा निवडणुकीतही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले़ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आमदार कर्डिले यांनी प्रवरेच्या आशीवार्दाने व विरोधकांच्या मर्मावर बोट ठेवून विजयश्री खेचून आणली़ येत्या पाच वर्षात डोंगराएवढी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागणार आहे. मुळा धरणाची उंची वाढविण्यापेक्षा कालवे व चाऱ्यांचे काँक्रिटीकरण केले तर दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल़ राहुरी ते शनिशिंगणापूर या रस्त्याचे चौपदरीकरण केले तर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल़ मिनी एम़आय़डी़सी़, एस़टी़ डेपो, पाण्याचे नियोजन, रेल्वे उड्डाणपूल आदी महत्वाचे प्रश्न त्यांच्यासमोर असतील.मुळा धरणाच्या कृपेने राहुरीत उसाचे क्षेत्र मोठे आहे़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार व उस उत्पादकांचे प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कर्डिलेंनी दिली होती़ सत्ताधारी पक्षात नव्हतो म्हणून भरीव काम करता आले नाही असे कर्डिले यांनी वेळोवेळी मान्य केले होते़ आता सत्ताधारी असल्याने पाच वर्षांत जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा मतदारांना त्यांच्याकडून आहे. (तालुका प्रतिनिधी)