शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कर्डिलेंकडून अच्छे दिनची अपेक्षा

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे.

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे. बुऱ्हाणनगर येथून सरपंचपदाची सुरूवात केलेल्या कर्डिले यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली़ नगर-नेवासे मतदारसंघातून तीनदा, तर राहुरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय संपादन करून राजकीय आखाड्यात डावपेच टाकण्यात ‘हम भी कुछ कम नही’ याची प्रचिती आणून दिली़लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघाची नाडी ओळखली़ या मतदारसंघात पाथर्डी व नगरच्या गावांचा समावेश झाला तेव्हा बुऱ्हाणनगरचा हा पहिलवान अडसर ठरेल असे कुणालाही वाटले नाही़ गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी तालुक्यातून दहा हजार मताधिक्य घेणाऱ्या कर्डिले यांनी ४७ टक्के मते मिळवून मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे़आमदार म्हणून कर्डिले यांनी गेल्या पाच वर्षांत राहुरी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा लावला होता. मात्र विरोधी पक्षात असल्याने त्यांना भरीव काम करता आले नाही़ आता पुन्हा राहुरीत कमळ फुलले असून राज्यात भाजपा सत्तेवर येत असताना मतदार संघातील नागरिकांना अच्छे दिनची प्रतीक्षा आहे़ येत्या पाच वर्षांत विविध प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान कर्डिले यांच्यासमोर आहे. आमदारकीच्या कालावधीत शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक आरोप झाले़ विधानसभा निवडणुकीतही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले़ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आमदार कर्डिले यांनी प्रवरेच्या आशीवार्दाने व विरोधकांच्या मर्मावर बोट ठेवून विजयश्री खेचून आणली़ येत्या पाच वर्षात डोंगराएवढी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागणार आहे. मुळा धरणाची उंची वाढविण्यापेक्षा कालवे व चाऱ्यांचे काँक्रिटीकरण केले तर दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल़ राहुरी ते शनिशिंगणापूर या रस्त्याचे चौपदरीकरण केले तर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल़ मिनी एम़आय़डी़सी़, एस़टी़ डेपो, पाण्याचे नियोजन, रेल्वे उड्डाणपूल आदी महत्वाचे प्रश्न त्यांच्यासमोर असतील.मुळा धरणाच्या कृपेने राहुरीत उसाचे क्षेत्र मोठे आहे़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार व उस उत्पादकांचे प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कर्डिलेंनी दिली होती़ सत्ताधारी पक्षात नव्हतो म्हणून भरीव काम करता आले नाही असे कर्डिले यांनी वेळोवेळी मान्य केले होते़ आता सत्ताधारी असल्याने पाच वर्षांत जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा मतदारांना त्यांच्याकडून आहे. (तालुका प्रतिनिधी)