शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

व्यायाम, आहार अन उपचार पध्दतीने मधुमेहापासून मिळेल सुटका : डॉ. गोपाळ बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:21 IST

दिवसेंदिवस देशात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देजागतिक मधुमेह दिन : लोकमत संवाद

अहमदनगर : दिवसेंदिवस देशात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेहाने ग्रासलेले दिसत आहे. उद्या जागतिक मधुमेह दिन आहे. त्यानिमित्ताने डॉ. गोपाळ बहुरूपी यांनी ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद...प्रश्न : मधुमेह होण्याची नेमकी कारणे काय ?डॉ.बहुरूपी : आज मधुमेहाने अनेकांना ग्रासले आहे. अगदी लहान मुलांचाही यामध्ये समावेश आहे. मधुमेह होण्याची तीन कारणे सांगता येतील. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि तिसरे कारण म्हणजे खाण्याच्या वाईट सवयी.प्रश्न- मधुमेह होेऊच नये यासाठी काय करावे ?डॉ.बहुरूपी : अगदी सोपे आहे. मधुमेह झाल्यानंतर ज्या बाबी करायच्या आहेत त्याच बाबी अगोदरपासूनच केल्या तर मधुमेह होणार नाही. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला तर मधुमेहच नाहीत तर अन्य आजारांपासून सुटका होईल.प्रश्न : मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे ?डॉ. बहुरुपी : उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण ८० ते १२० असावे. तर जेवण झाल्यानंतर १२० ते १६० असावे. याप्रमाणे साखरेचे प्रमाण आपण राखू शकलो तर त्रास होणार नाही.प्रश्न : मधुमेह बरा होण्यासाठी नेमके काय करावे ?डॉ. बहुरूपी : मधुमेह बरा होण्यासाठी फक्त चार बाबी गरजेच्या आहेत. नियमित व्यायाम, आहार, डॉक्टरांनी दिलेली गोळ््या-औषधे वेळेवर घेणे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे. या बाबी पाळल्या तर नक्कीच मधुमेहापासून सुटका होऊ शकते.प्रश्न : मधुमेह झाल्यानंतर आहार कसा असावा ?डॉ. बहुरूपी: मधुमेह झाल्यानंतर अनेक पथ्य पाळायला सांगितली जातात. यामुळे पेशंट घाबरून जातात. हे खाऊ नका, ते खाऊ नका असे सांगितले जाते. त्यामुळे वजन कमी होत जाते. दररोेज जेवणात अर्ध्या प्रमाणात फक्त पालेभाज्या खा. याशिवाय बरोबर भात, भाकर, चपाती खाऊ शकता. दाळ खाऊ शकता. अनेकांचे वजन आजारामुळे कमी न होता आहारामुळे कमी होते. केळी, आबा, चिकू आणि सीताफळ ही फळे खाऊ नयेत. उपवास कुठलाही करायाचा नाही. सकाळी नाष्ता, दुपारी अन संध्याकाळी जेवण केले तर मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.प्रश्न : व्यायामाचे महत्व काय आहे.डॉ. बहुरूपी : सर्वच आजारांमध्ये व्यायामाला फार मोठे महत्व आहे. बहुतांशी आजार व्यायामामुळेच बरे होतात. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे फार गरजेचे आहे.प्रश्न : उपचारपध्दती कशी असते.डॉ. बहुरूपी : गोळ््या आणि इन्सुलीनचा यामध्ये समावेश होतो. आहार आणि व्यायामातून आजार बरा होत नसेल तर उपचारपध्दतीचा अवलंब करावा लागतो. इन्सुलीनबद्दल अनेक गैरसमज आहेत. शरीराचा आजार बरा होण्यासाठी इन्सुलीनची गरज असते. त्यामुळे ती द्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांनी गैरसमज करून घेऊ नये.प्रश्न : गरोदर स्त्रीयांनाही मधुमेहाचा त्रास असतो. त्यांनी कशी काळजी घ्यावी.डॉ. बहुरूपी : अनेक गरोदर स्त्रीयांना मधुमेह असतोे. त्यावेळी गोळ््या उपयोगी पडत नाहीत. येथे इन्सुलीनचाच वापर करावा लागतो. आपल्या मुलाला याचा त्रास होईल असे अनेक मातांना वाटते. पण असे काहीही होत नाही. बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास इन्सुलीनमुळे होत नाही.प्रश्न : अनेक वेळा पेशंट घरच्या घरीच गोळ््या-ओषधे घेतात, त्याबद्दल...डॉ. बहुरूपी : काही पेशंट स्वत:च डॉक्टर होतात. थोडेसे बरे वाटले की त्याच गोळ््या सुरु ठेवतात. तपासणी करत नाहीत. पुढे असे पेशंट धोकादायक स्थितीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शरीराबरोबर खेळू नका. वेळोवेळी डॉक्टरांना भेटा. तपासणी करा. निश्चितच तुमचा मधुमेह बरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर