शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शेतीपंपाचे वीज बिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST

महावितरण कंपनीने डी. पी. बंद करून शेतीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

महावितरण कंपनीने डी. पी. बंद करून शेतीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीजबिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे. शेती पंपाचे वीजबिल भरा नाही तर डी. पी. बंद, अशी सक्ती लावली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता वीज पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. गारपीट झाली. सरकारी यंत्रणेने पंचनामे करून सरकारने अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला. अजूनही अनुदान आले नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वायरमन हे सर्व शेतकऱ्यांना किती तत्काळ सेवा देतात. डी. पी. नादुरूस्त होणे, वीज तारा तुटल्यास सर्व खर्च शेतकऱ्यांना वर्गणी करून करावा लागतो. एवढे करून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, असेही निवदेनात म्हटले आहे.

निवेदनावर क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, गोरक्षनाथ म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, नवनाथ ढगे, संदीप उंडे, शेखर पवार, राजेंद्र पेरणे, अर्जुन म्हसे, विजय म्हसे, मंजाबापू म्हसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.