शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहा दिवस उलटूनही शेतातील पिके पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:00 IST

मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.

सचिन नन्नवरे ।  मिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.मागील वर्षी या भागात पावसाने दडी मारली. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी भीती होती. त्यातच अधूनमधून पडलेल्या पावसावर शेतकºयांनी बाजरी, कापूस व कांद्यासारखी पिके घेतली होती. ही सर्व पिके काढणीला आली होती. त्यातच या भागात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतात तळे साचून शेतात उभे असलेले पीक पूर्णपणे चिखलमय होऊन सडून गेले आहे. त्यामुळे शेतात पाउलही ठेवता येत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक आपल्या डोळ्यादेखत सडताना पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. शेतकºयांनी मळणीसाठी जमा करून ठेवलेल्या बाजरीच्या कणसाला तर अक्षरश: कोंब फुटले. उभे असलेले बाजरीचे पीक सडले आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी तयार असलेला चांगल्या दर्जाचा कांदाही शेतातच राहून सडल्याने भाव असूनही शेतकºयांच्या पदरात मात्र निराशाच पडली आहे. कापूसही ऐन वेचणीच्या काळात असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्व कापूस काळवंडला आहे. या सर्व पिकांसह जनावरांसाठी उत्तर चारा म्हणून उपयोगात येणारे मका, ज्वारीचे पीकही पूर्णपणे वाया गेले आहे.या पिकांसह काही फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे एक तर पिकेही गेली व आर्थिक नुकसानही झाल्याने आता निदान शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करावी, विमा कंपनीनेही शंभर टक्के सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी लक्ष्मण लोंढे, संजय भानगुडे, दिलीप मुनोत, ललित मुनोत, भाऊसाहेब पाचरणे, जनार्दन वाघमोडे, भाऊसाहेब कांबळे, विक्रम वाघ आदींसह आडगाव, मिरी, रेणुकाईवाडी, शिराळ, शिंगवे केशव आदी शेतकºयांनी केली आहे.अवेळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे केले. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी व विमा कंपनीकडूनही पीक विमा मंजूर व्हावा यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलून पाठपुरावा केला जात आहे, असे पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी सांगितले.     सावकारी कर्ज काढून पिकांची लागवड केली. सर्व कुटुंबाने मेहनत करून पिके जगवली होती. परंतु, दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शासनाने आम्हाला आर्थिक मदत करून विमाही मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी लक्ष्मण लोंढे यांनी केली आहे.     कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे कळाल्याने शेतात असलेला कांदा काढणीची तयारी केली होती. परंतु, काढणीच्या आधीच अतिवृष्टी झाल्याने शेतातील कांदा शेतातच सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी विक्रम वाघ यांनी सांगितले.     

टॅग्स :Pathardiपाथर्डीCrop Insuranceपीक विमा