शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

आठवांनी दाटले हुंदके... नि:शब्द!

By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आणि त्यामुळे मुंडेंच्या राजकीय जीवनाचा पट उलगडत गेला.

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आणि त्यामुळे मुंडेंच्या राजकीय जीवनाचा पट उलगडत गेला. या आठवांनी बहुतेकांना हुंदकादाटून आला अन् पुढे सारे नि:श्शब्द झाले...सहकार सभागृहात मुंडे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेवर वरीलप्रमाणे सुतकी वातावरण होते. थोर, झुंजार नेता, आधारवड, दीपस्तंभ, राजकारणापलिकडचा मित्र अशा विशेषणांनी मुंडेंना श्रध्दांजली वाहिली. सर्वांनीच मुंडेंचे नगरमध्ये स्मारक उभे करून त्यांच्या आठवणी ग्रंथबद्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली.या सभेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ नेते मा.खा. बाळासाहेब विखे, मा.खा. यशवंतराव गडाख, खा. दिलीप गांधी, आ. अनिल राठोड, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बबनराव पाचपुते, आ. अरूण जगताप, आ. चंद्रशेखर घुले, आ. राम शिंदे, महापौर संग्राम जगताप,मा.आ. चंद्रशेखर कदम, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, काँग्रेसचे ब्रिजलाल सारडा, कुंडलिकराव जगताप, शिवाजी शेलार, कॉ. सुभाष लांडे, अजय साळवे, अशोक गायकवाड, नानासाहेब जाधव, शिवसेनेचे प्रा. गाडे आदी उपस्थित होते.अण्णाहजारे म्हणाले की, मुंडे यांच्या जाण्याने राष्ट्राची आणि राज्याची मोठी हानी झाली आहे. त्यांना तळागाळातील प्रश्नांची जाण होती. त्यांच्याशी माझे जुने संबंध होते. जो राष्ट्रासाठी देह ठेवतो. त्याच्या आत्म्याला सद््गती मिळते, असे भग्वद््गीतेचा आधार देत सांगितले.खा. गांधी म्हणाले की, नव्या पिढीला मुंडे यांचे काम समजावे यासाठी नगरमध्ये स्मारक उभे केले जाईल. जिल्ह्याला ते मावशी मानत होते. अनेक नेते, कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी संपर्क आला. प्रत्येकांच्याच काही ना काही आठवणी आहेत. त्या ग्रंथरूपात शब्दबद्ध केल्या जातील. पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथे बांधलेल्या समाजमंदिरास मुंडे यांचे नाव दिले जाईल. मुंडे यांचे राजकारण संघर्षाचे होते. सर्व पक्षात मित्र असूनही त्यांनी कधी लक्ष्मणरेषा ओलांडली नाही.गडाख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. परंतु तीन पुस्तकापलिकडे त्यांच्या कामाची माहिती नाही. मुंडेंचेही काम मोठेच आहे. परंतु त्यांचा राजकीयप्रवास नव्या पिढीसमोर पुस्तक रूपातून आला पाहिजे. ते पुस्तक कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल.पाचपुते म्हणाले की, ते राजकीय विरोधक असले तरी माझे चांगले मित्र होते. बीडचा पालकमंत्री झाल्यावर ते मला भेटायला आले होते. राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली.कर्डिले म्हणाले, मी त्यांच्यामुळेच आमदार झालो. त्यांचासारखा नेता होणे नाही. महायुतीला देशात सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.राठोड म्हणाले की, त्यांचा कायद्याचा मोठा अभ्यास होता. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले तरी ते डगमगले नाहीत. त्यांच्या जाण्याने समाजासोबतच सेना-भाजपाची हानी झाली आहे. शिवाजीराव शेलार यांच्यासह तब्बल ५१ जणांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)घडवून आणलेला अपघातमुंडे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होते. त्यांचा घडवून आणलेला अपघात सहनशीलतेपलिकडचा आहे. त्यांच्या जाण्याने भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असा आरोप मा. खा. बाळासाहेब विखे यांनी केला. मुंडे हे मोठ्या चव्हाणांनंतर महाराष्ट्रातले मोठे नेते होते. त्यांच्यावर मी राधाकृष्णपेक्षाही जास्त प्रेम केले. त्यांनी प्रस्थापितांविरोधात उभारलेले राजकारण लोकांना आवडायचे.टायर फुटलाय...विखे यांचे भाषण संपल्यानंतर ते सभागृहाबाहेर पडले. त्यावेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या कंबरेच्या पिस्तुलातून गोळी सुटून ती छतावर लागली. त्याचा आवाज झाल्याने सभागृहातील लोक बाहेर काय झाले ते पाहायला जाऊ लागले. त्यावेळी घनश्याम शेलार यांचे भाषण सुरू होते. त्यांनी ‘काही नाही बाहेर गाडीचा टायर फुटलाय’ असे सांगून प्रसंगावधान राखले. नाही तर अनर्थ ओढवला असता.