शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

बाहेरगावाहून गावात विनापरवानगी येणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी आता कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्‍थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:26 IST

अहमदनगर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्‍मक उपयायोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होण्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर ''कोरोना ग्रामसुरक्षा समिती'' स्‍थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

अहमदनगर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्‍मक उपयायोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होण्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर ''कोरोना ग्रामसुरक्षा समिती'' स्‍थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. गावचे सरपंच हे या समितीचे अध्यक्ष तर पोलिस पाटील हे सदस्य सचिव असणार आहेत. याशिवाय तलाठी आणि ग्रामसेवक हे यात सदस्य राहणार आहेत.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

 

ग्रामीण भागामध्‍ये बाहेरुन वास्‍तव्‍यास आलेली व्‍यक्‍ती (ऊसतोड कामगार, परराज्‍यातील / पुणे, मुंबई व इतर जिल्‍हयातून आलेले, विदयार्थी, भाविक, पर्यटक इ.) मग ती व्‍यक्‍ती गावातील असो किंवा बाहेरील असो किंवा गावातील व्‍यक्‍तीची नातेवाईक, मित्र, हितचिंतक हे गावात येत असल्‍याची बाब निदर्शनास आलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दुष्‍टीने बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींपासुन संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी गावपातळीवर निर्देश देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास येणा-या व्‍यक्‍तींना परवानगी नसल्‍यास गावात प्रवेश देऊ नये. तथापी परवानी असल्‍यास तहसीलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक (Incident Commandar) यांचे निदर्शनास आणून दिल्‍यानंतरच गावात प्रवेश द्यावा.

बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे नाव व इतर सविस्‍तर तपशिल यांची नोंद सदस्‍य सचिव यांनी ठेवायची आहे. ज्‍या गावामध्‍ये पोलीस पाटील नाहीत त्‍या ठिकाणी ग्रामसेवक सदस्‍य सचिव म्‍हणून कामकाज पाहतील.

 

बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरणासाठी इमारत (उदा. जिल्‍हा परिषद शाळा, अंगणवाडी भवन इत्‍यादी) सुनिश्चित करुन ठेवावी व सदर व्‍यक्‍तींची व इमारतीची देखभाल व सुरक्षा संबंधीत ग्रामपंचायतीने करावी.

बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींची आरोग्‍य विभागामार्फत तात्‍काळ तपासणी करावी. बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे पुढील 14 दिवसांसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरण बंधनकारक राहील व तसे संबंधीतांच्‍या हातावर शिक्‍के मारण्‍यात यावे. तसे न केल्‍यास याची गांभिर्याने दखल घेण्‍यात येईल.

सारी आणि कोविड-19 सदृश्‍य लक्षणे आढळून आल्‍यास अशा व्‍यक्‍तींची माहिती तात्‍काळ तालुका कोव्‍हीड केअर सेंटर (सी.सी.सी.) यांना कळविण्‍यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणतीही व्‍यक्‍ती / संस्‍था / संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लघन केल्‍यास भारतीय दंड संहिता      (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र असतील.