शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण प्रेमी शाळा; माळरानावर नंदनवन भाऊसाहेब येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:54 IST

सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़

राहुरी : सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़ दीड हजार कडूलिंब असलेली अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाकडे पाहिले जाते़ २००३ मध्ये हरित सेनेची स्थापना करण्यात आली़ त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग विविध उपक्रमाव्दारे वाढत गेल्याने परिसर निसर्गरम्य बनला आहे़वृक्ष लागवडीपासून ते संगोपनापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते़ त्यातून पर्यावरणाला मदत होत आहे़ शालेय परिसरात हजारो झाडे दिमाखाने उभी आहेत. विद्यार्थी व शिक्षकांनी करंज, लिंब, काशिद, आवळा, पळस, सप्तपर्णी, अडुळसा, बेहडा, हिरडा, आवळा अशा विविध प्रकारची झाडे लावली आहेत.वृक्ष लागवडीबरोबरच जास्तीत जास्त झाडे जगविण्यावर सावित्रीबाई फुले विद्यालयाने भर दिला आहे़ वृक्षसंपदा वाढल्यामुळे साळुंकी, टिटवी, कावळे, चिमण्या, बुलबुल, भारव्दाज आदी पक्ष्यांची संख्या परिसरात वाढली आहे़ शालेय परिसराचे सुशोभिकरण करताना हरित सेनेच्या माध्यमातून कचरा होळी अर्थाव कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ रंगपंचमीला नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ फु ले, पाने व फळे यापासून तयार केलेल्या नैसर्गिक रंग विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला जातो़ केमिकलपेक्षा नैसर्गिक रंग आरोग्याच्यादृष्टीने किती महत्वाचे आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांना येते़ झाडांना रक्षाबंधन करून झाडे जगविण्याची प्रतीज्ञा विद्यार्थ्यांना दिली जाते़ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड वृध्दिंगत व्हावी म्हणून प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते़ पर्यावरण पूरक हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ वडाचे झाड लावून त्याची पूजा केली जाते़ कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टीकचे दुष्परिणाम सांगितले जातात़ पर्यावरण पूरक प्रतिज्ञेचे आयोजन केले जाते़ दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाऊ नये म्हणून प्रबोधन केले जाते़केनियाच्या अभ्यासक ह्यूमा मॅडम यांना एकाच शाळेत एवढ्या मोठया प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत म्हणून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखालीच माहिती देण्यासाठी आल्या़ वृक्षारोपण केल्याबद्दल वनीकरण विभागाच्या कीर्ती कोकाटे यांनी भेट देऊन कौतुक केले़ वृक्षारोपणामुळे तापमानाचे प्रमाण क मी झाले असून आरोग्य उंचावण्यास मदत झाली आहे़- बाळासाहेब डोंगरे, सचिव, हरित सेना सावित्रीबाई फुले विद्यालय.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर