शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पर्यावरण प्रेमी शाळा; माळरानावर नंदनवन भाऊसाहेब येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:54 IST

सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़

राहुरी : सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़ दीड हजार कडूलिंब असलेली अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाकडे पाहिले जाते़ २००३ मध्ये हरित सेनेची स्थापना करण्यात आली़ त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग विविध उपक्रमाव्दारे वाढत गेल्याने परिसर निसर्गरम्य बनला आहे़वृक्ष लागवडीपासून ते संगोपनापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते़ त्यातून पर्यावरणाला मदत होत आहे़ शालेय परिसरात हजारो झाडे दिमाखाने उभी आहेत. विद्यार्थी व शिक्षकांनी करंज, लिंब, काशिद, आवळा, पळस, सप्तपर्णी, अडुळसा, बेहडा, हिरडा, आवळा अशा विविध प्रकारची झाडे लावली आहेत.वृक्ष लागवडीबरोबरच जास्तीत जास्त झाडे जगविण्यावर सावित्रीबाई फुले विद्यालयाने भर दिला आहे़ वृक्षसंपदा वाढल्यामुळे साळुंकी, टिटवी, कावळे, चिमण्या, बुलबुल, भारव्दाज आदी पक्ष्यांची संख्या परिसरात वाढली आहे़ शालेय परिसराचे सुशोभिकरण करताना हरित सेनेच्या माध्यमातून कचरा होळी अर्थाव कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ रंगपंचमीला नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ फु ले, पाने व फळे यापासून तयार केलेल्या नैसर्गिक रंग विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला जातो़ केमिकलपेक्षा नैसर्गिक रंग आरोग्याच्यादृष्टीने किती महत्वाचे आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांना येते़ झाडांना रक्षाबंधन करून झाडे जगविण्याची प्रतीज्ञा विद्यार्थ्यांना दिली जाते़ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड वृध्दिंगत व्हावी म्हणून प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते़ पर्यावरण पूरक हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ वडाचे झाड लावून त्याची पूजा केली जाते़ कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टीकचे दुष्परिणाम सांगितले जातात़ पर्यावरण पूरक प्रतिज्ञेचे आयोजन केले जाते़ दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाऊ नये म्हणून प्रबोधन केले जाते़केनियाच्या अभ्यासक ह्यूमा मॅडम यांना एकाच शाळेत एवढ्या मोठया प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत म्हणून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखालीच माहिती देण्यासाठी आल्या़ वृक्षारोपण केल्याबद्दल वनीकरण विभागाच्या कीर्ती कोकाटे यांनी भेट देऊन कौतुक केले़ वृक्षारोपणामुळे तापमानाचे प्रमाण क मी झाले असून आरोग्य उंचावण्यास मदत झाली आहे़- बाळासाहेब डोंगरे, सचिव, हरित सेना सावित्रीबाई फुले विद्यालय.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर