शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

पर्यावरण प्रेमी शाळा; माळरानावर नंदनवन भाऊसाहेब येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:54 IST

सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़

राहुरी : सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़ दीड हजार कडूलिंब असलेली अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाकडे पाहिले जाते़ २००३ मध्ये हरित सेनेची स्थापना करण्यात आली़ त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग विविध उपक्रमाव्दारे वाढत गेल्याने परिसर निसर्गरम्य बनला आहे़वृक्ष लागवडीपासून ते संगोपनापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते़ त्यातून पर्यावरणाला मदत होत आहे़ शालेय परिसरात हजारो झाडे दिमाखाने उभी आहेत. विद्यार्थी व शिक्षकांनी करंज, लिंब, काशिद, आवळा, पळस, सप्तपर्णी, अडुळसा, बेहडा, हिरडा, आवळा अशा विविध प्रकारची झाडे लावली आहेत.वृक्ष लागवडीबरोबरच जास्तीत जास्त झाडे जगविण्यावर सावित्रीबाई फुले विद्यालयाने भर दिला आहे़ वृक्षसंपदा वाढल्यामुळे साळुंकी, टिटवी, कावळे, चिमण्या, बुलबुल, भारव्दाज आदी पक्ष्यांची संख्या परिसरात वाढली आहे़ शालेय परिसराचे सुशोभिकरण करताना हरित सेनेच्या माध्यमातून कचरा होळी अर्थाव कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ रंगपंचमीला नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ फु ले, पाने व फळे यापासून तयार केलेल्या नैसर्गिक रंग विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला जातो़ केमिकलपेक्षा नैसर्गिक रंग आरोग्याच्यादृष्टीने किती महत्वाचे आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांना येते़ झाडांना रक्षाबंधन करून झाडे जगविण्याची प्रतीज्ञा विद्यार्थ्यांना दिली जाते़ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड वृध्दिंगत व्हावी म्हणून प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते़ पर्यावरण पूरक हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ वडाचे झाड लावून त्याची पूजा केली जाते़ कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टीकचे दुष्परिणाम सांगितले जातात़ पर्यावरण पूरक प्रतिज्ञेचे आयोजन केले जाते़ दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाऊ नये म्हणून प्रबोधन केले जाते़केनियाच्या अभ्यासक ह्यूमा मॅडम यांना एकाच शाळेत एवढ्या मोठया प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत म्हणून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखालीच माहिती देण्यासाठी आल्या़ वृक्षारोपण केल्याबद्दल वनीकरण विभागाच्या कीर्ती कोकाटे यांनी भेट देऊन कौतुक केले़ वृक्षारोपणामुळे तापमानाचे प्रमाण क मी झाले असून आरोग्य उंचावण्यास मदत झाली आहे़- बाळासाहेब डोंगरे, सचिव, हरित सेना सावित्रीबाई फुले विद्यालय.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर