शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी वाचन संस्कृती वाढविलेला ग्रंथप्रेमी; दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 13:24 IST

सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके  आहेत. 

भाऊसाहेब येवले । राहुरी : लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झालेल्या राहुरी येथील ग्रंथप्रेमी सुरेश हराळ यांनी लहानपणापासून गावोगावी वाचन संस्कृती निर्माण केली आहे. सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके  आहेत. नाट्यक्षेत्रात रूची असलेल्या सुरेश हराळ यांनी नाटकात अभिनय करताना अनेक मित्र जोडले आहेत.राज्य शासनाचा ग्रंथमित्र हा पुरस्कार प्राप्त झालेल्या सुरेश हराळ यांना नववीत असताना वाचनाची आवड निर्माण झाली. कॅनल इन्सपॉक्टर म्हणून कार्यरत असलेले वडील बाबूराव हराळ यांनी सुरेश यांना दिल्ली येथील बुक क्लबचे सदस्य केले. दरमहा तीन चार हिंदी पुस्तके पोस्टाने मिळत असते़ गुलजार, सत्यजित रे, प्रेमचंद, रविंद्रनाथ टागोर प्रथितयश हिंदी लेखकांची पुस्तक वाचनाची संधी मिळाली. त्यातून सुरेश हराळ यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. वाचनातून वाचनालय सुरू करण्याची संधी मिळाली. त्यातून १९७२ मध्ये वि़. दा़. सावरकर वाचनालय सुरू केले.ग्रामीण भागात वाचनालय संस्कृती वाढावी म्हणून सायकलवरून रपेट मारून राहुरीसह मुळानगर, राहुरी फॅक्टरी, विद्यापीठ आदी ठिकाणी घरोघरी जाऊन पुस्तके वाचण्यास उपलब्ध करून दिली. १९७७ मध्ये लातूर येथे ग्रंथपाल क ोर्स सुरू केला. १९७९ मध्ये ग्रंथपाल म्हणून विद्या मंदिर प्रशालेमध्ये नोकरी स्वीकारली़. १९८४ मध्ये जिजामाता ग्रंथालयाची उभारणी केली़. आज या ग्रंथालयात पंधरा हजार पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविण्याचे काम सुरेश हराळ यांनी केले. अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघात सदस्य म्हणून सुरेश हराळ यांची निवड झाली़. ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे यांच्याबरोबर जिल्ह्यात शेकडो वाचनालयांना मार्गदर्शन केले. वाचनालय कसे सुरू करायचे, वाचक संख्या कशी वाढवयाची, रजिस्टेशन कसे करायचे, अनुदान आदी बाबत सुरेश हराळ यांनी माहिती उपलब्ध करून देत मार्गदर्शन केले. वाचन संस्कृती वाढावी म्हणून रवींद्र भट, डॉ़ किशोर काळे, मेघा कुलकर्णी, बाबा भांड, ह़. मो. मराठे यांना बोलावून वाचकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली.ग्रंथमित्र सुरेश हराळ यांची भूक केवळ वाचकांपुरती मर्यादित राहिली नाही. नाटकात भाग घेऊन विचारपीठ उपलब्ध करून दिले. सदाशिव अमरापुरकर, सविता प्रभुणे, लिला गांधी कलाकारांना राहुरीला बोलाविले. मी सावित्रीबाई बोलते या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग राहुरीला आयोजित केला होता. वाचन चळवळीची दखल घेऊन राज्य शासनाने सुरेश हराळ यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव केला. ग्रंथमित्र हराळ यांनी पुस्तक पे्रमामुळे स्वत:चे घरात ग्रंथालय साकारले आहे. अनेक दुर्मिळ पुस्तके संग्रही आहेत. वाचनातून पे्ररणा मिळत गेली़ त्यातून व्यक्तिमत्त्व फुलत गेले. सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती जतन करण्याचे काम हराळ करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीlibraryवाचनालयliteratureसाहित्य