शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:24 IST

पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे.

अहमदनगर : पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे सरकारने पाहणी अहवालाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. खासदार चव्हाण म्हणाले, देशभरात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन-चार रुपयांनी भाव कमी करणे ही फसवणूक आहे. एकीकडे भाव कमी केले जातात तर दुसरीकडे दररोज भाव वाढविले जात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नवरात्र, दिवाळीचे सण आता सुरु होत आहे. या सणांमध्ये भारनियमन सुरु केले आहे. पाऊस नसल्याने विद्युत पंप सुरु नाहीत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAshok Chavanअशोक चव्हाण