शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यत एल्गार सुरुच राहणार - डॉ. अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 11:28 IST

भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिला.

ठळक मुद्देअकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे रास्तारोको

अकोले : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिला.तालुक्यातील कळस बुद्रुक येथे आज सकाळी ८ वाजता छावा वारियर्स व कळस बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे दोन तास अडवून धरीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. यावेळी कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा दिला.डॉ.अजित नवले म्हणाले, या सरकारच्या काळात शेतमालाला बाजारभाव नाही. शेतीला केलेला खर्च सुद्धा फिटत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून तो आत्महत्या करीत आहे. शेतकरी संघटना शेतक-यांसाठी लढा उभारीत असून सर्व शेतक-यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहन डॉ.नवले यांनी केले. रास्तारोको आंदोलनाचे सुत्रसंचालन आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केले. रास्तारोको आंदोलनामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्तारोको आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे डॉ.संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले