शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अकरावीचा ‘कट आॅफ’ पाच टक्क्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:02 IST

मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे.

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे. दुसरीकडे कला शाखेला विद्यार्थीच मिळत नसल्याने सर्वच महाविद्यालयांत या शाखेसाठी थेट प्रवेश दिला जात आहे.जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल अकरा टक्क््यांनी कमी लागला आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा कमी विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले. मंगळवारी शहरातील महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. मागील वर्षी विज्ञानचा कट आॅफ ९५ टक्क््यांच्या पुढे होता. तो आता ९० पर्यंत खाली आला आहे.रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान खुला प्रवर्ग ९३, तर वाणिज्यचा कट आॅफ (मराठी माध्यम) ७५ व ८८ (इंग्रजी माध्यम) असा राहिला. न्यू आर्टसमध्ये विज्ञान खुल्या वर्गाचा कट आॅफ ८५पर्यंत आला आहे. येथीलच वाणिज्य खुल्या वर्गातील मराठी माध्यमाचा कट आॅफ ६५, तर इंग्रजी माध्यमाचा कट आॅफ ८५ पर्यंत आला आहे. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात खुल्या वर्गातील मुलींना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा असेल तर ९० टक्क््यांच्या पुढे गुण हवेत. तर वाणिज्यसाठीही ७६ टक्के गुण हवेत. पहिल्या यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ६ जुलैपर्यंत निश्चित होतील. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आल्याने त्यांचा कट आॅफ स्वतंत्र्यरित्या जाहीर करण्यात आला आहे.कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याने येथे उपलब्ध जागेच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे कला शाखेची गुणवत्ता यादी कोणत्याच महाविद्यालयाने जाहीर केलेली नाही. जेवढे अर्ज येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर