शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

नगर जिल्ह्यातील ६६ हजार शेतक-यांनी भरले वीजबिलाचे २२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:33 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्दे२१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे.

अहमदनगर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरच्या अगोदर मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन सवलतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.शेतक-यांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार शेतक-यांकडे वीजबिलाची २ हजार २८५ कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे.

जोडणीनंतर ६६ हजार ग्राहकांनी एकदाही बिलच भरले नाही

वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबिलाची रक्कम न भरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ६५ हजार ६९६ इतकी आहे. तर दुसरीकडे महावितरणने गेल्या तीन वर्षात १ लाख १०४३ कृषिपंप ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही वीजबिल न भरणाºया जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त आहे. यातून महावितरणसमोरील आर्थिक अडचण लक्षात येऊ शकेल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण