शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील ६६ हजार शेतक-यांनी भरले वीजबिलाचे २२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:33 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्दे२१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे.

अहमदनगर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरच्या अगोदर मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन सवलतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.शेतक-यांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार शेतक-यांकडे वीजबिलाची २ हजार २८५ कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे.

जोडणीनंतर ६६ हजार ग्राहकांनी एकदाही बिलच भरले नाही

वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबिलाची रक्कम न भरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ६५ हजार ६९६ इतकी आहे. तर दुसरीकडे महावितरणने गेल्या तीन वर्षात १ लाख १०४३ कृषिपंप ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही वीजबिल न भरणाºया जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त आहे. यातून महावितरणसमोरील आर्थिक अडचण लक्षात येऊ शकेल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण