शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
3
मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
4
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
5
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
6
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
7
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
8
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे,'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
9
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
10
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
11
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
12
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
13
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
14
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
15
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
16
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
17
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
18
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
19
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
20
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 3, 2023 16:54 IST

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे.

अहमदनगर : तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच प्रत्येक हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते १० हजार रुपयांचे अनुदान वर्ग करीत आहेत. त्यामुळे तेथील एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्र हा सर्व बाबतीत समृद्ध असूनही हे महाराष्ट्रात का शक्य होत नाही, असा सवाल करीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी-समृद्ध करु शकतो, असे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक दशरथ सावंत यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक टिळक भोस, संदीप राजळे, राजेश भाटिया, विवेक मोरे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, २०१४ साली तेलंगणा स्वतंत्र राज्य झाले. त्यावेळी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला तेथील जनतेने सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशाला दिशादर्शक ठरावेत, असे प्रकल्प राबविले. घरोघरी नळाचे शुद्ध पाणी पोहोचविले. मोफत वीज व मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले. 

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. सदस्य नोंदणी अभियान संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील शेतीविकासाचे मॉडेल दाखविण्यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर