शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 3, 2023 16:54 IST

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे.

अहमदनगर : तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच प्रत्येक हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते १० हजार रुपयांचे अनुदान वर्ग करीत आहेत. त्यामुळे तेथील एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्र हा सर्व बाबतीत समृद्ध असूनही हे महाराष्ट्रात का शक्य होत नाही, असा सवाल करीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी-समृद्ध करु शकतो, असे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक दशरथ सावंत यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक टिळक भोस, संदीप राजळे, राजेश भाटिया, विवेक मोरे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, २०१४ साली तेलंगणा स्वतंत्र राज्य झाले. त्यावेळी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला तेथील जनतेने सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशाला दिशादर्शक ठरावेत, असे प्रकल्प राबविले. घरोघरी नळाचे शुद्ध पाणी पोहोचविले. मोफत वीज व मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले. 

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. सदस्य नोंदणी अभियान संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील शेतीविकासाचे मॉडेल दाखविण्यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर