शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 3, 2023 16:54 IST

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे.

अहमदनगर : तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच प्रत्येक हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते १० हजार रुपयांचे अनुदान वर्ग करीत आहेत. त्यामुळे तेथील एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्र हा सर्व बाबतीत समृद्ध असूनही हे महाराष्ट्रात का शक्य होत नाही, असा सवाल करीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी-समृद्ध करु शकतो, असे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक दशरथ सावंत यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक टिळक भोस, संदीप राजळे, राजेश भाटिया, विवेक मोरे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, २०१४ साली तेलंगणा स्वतंत्र राज्य झाले. त्यावेळी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला तेथील जनतेने सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशाला दिशादर्शक ठरावेत, असे प्रकल्प राबविले. घरोघरी नळाचे शुद्ध पाणी पोहोचविले. मोफत वीज व मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले. 

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. सदस्य नोंदणी अभियान संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील शेतीविकासाचे मॉडेल दाखविण्यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर