शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

व्यवसायांवर कोसळली ‘वीज’!

By admin | Updated: May 29, 2014 00:25 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भारनियमन व मागील दोन महिन्यांपासून तातडीचे होत असलेले शटडाऊन यामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भारनियमन व मागील दोन महिन्यांपासून तातडीचे होत असलेले शटडाऊन यामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत. व्यावसायिकांचे अर्थकारणच यामुळे बिघडले असून कामाच्या वेळेसच वीज नसल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. या दुहेरी नुकसानीमुळे व्यापार्‍यांत महावितरणविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात राज्यभर विजेची मागणी वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सुमारे पाच ते सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण होत आहे. याची तोंडमिळवणी करण्यासाठी इमर्जन्सी शटडाऊन सध्या सुरू आहे. नेहमीचे भारनियमन तर वेगळेच. यामुळे ग्राहक जसे मेटाकुटीला आले आहेत, त्यापेक्षा ज्यांचे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत अशा व्यावसायिकांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे. भारनियमनाची वेळ दिवसाचीच असल्याने कामात मोठे अडथळे येतात. शहरापेक्षा ग्रामीण भागाची स्थिती भयंकर आहे. पिठाच्या चक्क््या, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, झेरॉक्स मशीन, फेब्रिकेशन, किराणा दुकाने, थंड-पेयांचे स्टॉल, हॉटेल यांना विजेअभावी जबरदस्त फटका बसला आहे. रात्री-अपरात्री केव्हातरी वीज आली की पीठ चक्कीवाल्यांना धावपळ करावी लागते, त्यासाठी रात्र जागवण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची किंवा दुरूस्तीची दुकाने तर विजेशिवाय उघडतच नाहीत. फेब्रिकेशन दुकानांत तर हातावर हात धरून बसण्याशिवाय मार्गच नसतो. उत्पादन होत नसल्याने होणारा तोटा व कामगारांना बसून पगार या दुहेरी नुकसानीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळयात थंड पेयांची किंवा आईसक्रिमची दुकाने वीज नसल्याने तोट्यात जात आहेत. थंड नसलेली पेय ग्राहक स्वीकारत नसल्याने त्या मालाला सांभाळण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागते. हॉटेल व्यावसायिकांनाही भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. (प्रतिनिधी) ग्राहकांना ठरलेल्या वेळेत वस्तू तयार करून हव्या असतात. त्यासाठी ते आगावू रक्कमही देतात. परंतु वीज नसल्याने सर्व कामे खोळंबून पडली आहेत. रोजंदारीचे चार कर्मचारी बसून असतात. त्यांची रोजंदारी चुकत नाही. शिवाय वेळेत वस्तू तयार न झाल्यास ग्राहकांच्या लाखोल्या ऐकाव्या लागतात. आम्ही वेळेवर वीजबिल भरतो तरीही भारनियमनाचा भुर्दंड आम्हाला का? - किसन काळे, फेब्रिकेशन व्यावसायिक घरगुती ग्राहकांपेक्षा व्यावसायिकांना महावितरण दुपटीने दर आकारते. घरगुती ग्राहकांपेक्षा वीजवापर कमी असला तरी त्यांना व्यावसायिक दरानेच बिल भरावे लागते. परंतु वेळेवर बिल भरूनही वीज मिळत नसल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे वीजचोरी करणार्‍यांचे फावत असून, महावितरणचा मात्र त्यांच्यावर अंकुश नाही.