शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात शेती, पाणी प्रश्नावरच निवडणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:45 IST

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.

श्रीरामपूर विधानसभा - शिवाजी पवार । श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.मतदारसंघात श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरासह ३२ गावांचा समावेश होतो. काँग्रेसच्या लहू कानडे यांच्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थकांनी मोट बांधली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचे पदाधिकारीही सक्रिय आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्वीकारली आहे.मंत्री राधाकृष्ण विखे यांनी येथे दहाहून अधिक दौरे केले. त्यांनी मतदारसंघात तळ ठोकल्याने निवडणूक हायप्रोफाईल बनली आहे. गेली वीस वर्षे दिवंगत जयंत ससाणे व विखे यांच्यात आघाडी राहिली. ती आता तुटली आहे. विखे व मुरकुटे अशी नवी युती जन्माला आली आहे.शिवसेना व भाजप येथे सन १९९० च्या दरम्यान अवघ्या ५ ते १० हजार मतांपुरती मर्यादित होती. मात्र मागील निवडणुकीत भाजपने ४५ तर सेनेने तब्बल ४० हजार मतांपर्यंतची मजल गाठली. ग्रामपंचायती, सेवा संस्था व सहकाराच्या परिघाबाहेरील नवीन कार्यकर्ते सेना-भाजपने जोडले. श्रीरामपूर शहरात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. देवळाली प्रवरा येथे चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर एकहाती सत्ता आहे.  दुसरीकडे काँग्रेसला मानणारा सर्वच थरातील वर्ग आहे. त्यामुळेच मोदी लाटेतही गतवेळी काँग्रेसने येथे बाजी मारली. सलग २० वर्षे पक्षाने येथे झेंडा रोवला. याखेपेलाही संगमनेरनंतर काँग्रेसला श्रीरामपुरातूनच अपेक्षा आहेत.माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकीय खेळीतूनच कांबळेंना सेनेची उमेदवारी मिळाली. त्यात मंत्री विखे यांनी सर्वच नेत्यांना एका छताखाली आणले. विखे यांनी अंतिम टप्प्यात चमत्कार करण्याचे भाकित केले आहे. मात्र काँग्रेसकडूनही तितक्याच आक्रमकतेने प्रचार सुरू आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाऊसाहेब पगारे, एमआयएम पक्षाकडून सुरेश जगधने, निवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हेदेखील रिंगणात आहेत. चुरशीच्या लढतीत ही मते निर्णायक ठरतील. अपक्ष व इतर उमेदवारांना उतरविण्यामागे खेळी असल्याचीही चर्चा रंगते आहे. निळवंडे धरणाचे कालवे व प्रवरा नदीपात्रातील भूमिगत बंधाºयावरून एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यात आपसूकच माजी मंत्री मधुकरराव पिचड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे हे प्रचारात ओढले जात आहेत.  प्रचारातील प्रमुख मुद्देआपण स्थानिक उमेदवार आहोत. लोकांसाठी सहजासहजी उपलब्ध होतो. राजकीय जीवनात साधेपणाने वावरतो. विखे व मुरकुटे यांच्या मदतीने तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. गत पाच वर्षे विरोधी पक्षात राहिलो. आता मात्र विकासाला चालना देऊ, असा प्रचार कांबळेंच्या वतीने केला जात आहे.काँग्रेसकडूनही कांबळे व सेना-भाजपचा समाचार घेतला जातो आहे. शेतमालाला हमी भाव नाही. कांद्याची निर्यात रोखली. दुष्काळी यादीतून तालुका वगळला गेला. पीक विम्याचा कुठलाही लाभ झाला नाही. कांबळे यांचा  प्रशासनावर वचक नाही, अशी टीका सुरू आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019