शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकनाथ खडसेंच्या कामाचा सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:37 IST

संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

     नाशिक-पुणे महामार्गावरील घुलेवाडी फाटा येथे नव्याने होणाºया न्यायालयाच्या इमारतीची पाहणी शुक्रवारी ( ९ आॅक्टोंबर) मंत्री थोरात यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, भाजप आमदार, कार्यकर्ते यांचे मनोबल वाढविण्यासाठी भाजपकडून अशी वक्तव्य केली जातात. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात अनेकांनी दर १५ दिवसाला सत्ता बदलाचे वक्तव्य केले होते.

    माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊ व मी तीस वर्ष एकत्र राहिलो. वेगवेगळ्या पक्षात असताना मतमतांतरे असतात परंतू ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे विधानसभेतील व विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचा भाजपला फायदा झाला. मात्र, त्यांचा जो सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही. यांचे आम्हाला वाईट वाटते. ‘आमच्या घरातले म्हणून तुम्ही त्यांना मारणार असाल तर माणूस नाराज होणारच’ असेही थोरात म्हणाले.

 ‘रिपब्लिक ’ने चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम केलेटेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. याबाबत महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, टीआरपी घोटाळा कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुढे आणला होता. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीची भूमिका अ्राकस्तपणाची आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा खांब आहेत. मात्र, भ्रष्ट मार्ग अंवलबणे चुकीचे आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम रिपब्लिक वृत्तवाहिनीने केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. असेही थोरात म्हणाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात