शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

एकनाथ खडसेंच्या कामाचा सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:37 IST

संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

     नाशिक-पुणे महामार्गावरील घुलेवाडी फाटा येथे नव्याने होणाºया न्यायालयाच्या इमारतीची पाहणी शुक्रवारी ( ९ आॅक्टोंबर) मंत्री थोरात यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, भाजप आमदार, कार्यकर्ते यांचे मनोबल वाढविण्यासाठी भाजपकडून अशी वक्तव्य केली जातात. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात अनेकांनी दर १५ दिवसाला सत्ता बदलाचे वक्तव्य केले होते.

    माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊ व मी तीस वर्ष एकत्र राहिलो. वेगवेगळ्या पक्षात असताना मतमतांतरे असतात परंतू ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे विधानसभेतील व विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचा भाजपला फायदा झाला. मात्र, त्यांचा जो सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही. यांचे आम्हाला वाईट वाटते. ‘आमच्या घरातले म्हणून तुम्ही त्यांना मारणार असाल तर माणूस नाराज होणारच’ असेही थोरात म्हणाले.

 ‘रिपब्लिक ’ने चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम केलेटेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. याबाबत महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, टीआरपी घोटाळा कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुढे आणला होता. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीची भूमिका अ्राकस्तपणाची आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा खांब आहेत. मात्र, भ्रष्ट मार्ग अंवलबणे चुकीचे आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम रिपब्लिक वृत्तवाहिनीने केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. असेही थोरात म्हणाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात