शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांची मंगलमय तोतयागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:12 IST

‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोरों का, ये साथी है चोरों का बातों और दलीलों का, ये है खेल वकीलों का’ हे गीत आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोरों का, ये साथी है चोरों का बातों और दलीलों का, ये है खेल वकीलों का’ हे गीत आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘ये अंधा कानून है’ या चित्रपटातील. आज हे गीत आठवण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी (दि़२२) जिल्ह्यात एका तोतया वकिलाचा झालेला भांडाफोड. न्यायालयाने या वकिलावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या निमित्ताने मात्र न्यायदेवतेच्या डोळ्यात धुळफेक करून कशा तोतया आपले इप्सित कशा पद्धतीने साध्य करतात हे समोर आले आहे.वकिल असल्याचा डंका पिटवून न्यायालयात वकिली करणाऱ्या कर्जत येथील मंगलेश भालचंद्र बापट या तोतयाचा तब्बल आठरा वर्षानंतर भंडाफोड झाला. गेली अठरा वर्षे बापट याने तालुक्यापासून ते जिल्हा व उच्च न्यायालयातही वकिली केली. आरोपी, फिर्यादींच्यावतीने बाजू लढविली. प्रत्यक्षात मात्र त्याच्या वकिलीची सनदच बनावट असल्याचे समोर आले. काळ्या कोटाच्या मागे दडलेल्या या तोतयाने किती जणांना न्याय दिला आणि किती सर्वसामान्यांना लुबाडले याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. बापट १८ वर्षे वकिली करत होता. ही बाब कुणाच्याच कशी निदर्शनास आली नाही. न्यायमंदिरात सत्य मांडून निरपेक्ष न्यायदानाला मदत करणे हे खरे वकिलांचे काम. पदवी आणि सनद घेतल्यानंतर वकिली व्यवसाय करता येते. बापट याने मात्र बनावट कागदपत्रांच्या अधारे सनद घेत न्यायाव्यवस्थेची चेष्टाच केली आहे़ ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने त्यांची प्रकरणे वकिलांकडे देतात. आपल्याला न्याय मिळावा, हिच त्यांची अपेक्षा असते. यासाठी ते वकिल सांगेल ती फी देण्याचा प्रयत्न करतात. वकिली व्यवसायात मात्र असे तोतया आले तर कुणाच्या माध्यमातून न्याय मागायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृन खून झाला तेव्हा हाच बापट आरोपींची बाजू लढण्यासाठी पुढे धावला होता. त्याने जिल्हा न्यायालयात तसा अर्जही सादर केला होता. यावेळी आरोपींनी मात्र सरकारी वकिलांची मागणी केल्याने बापट या खटल्यापासून दूर झाला. युवराज हनुमंत नवसरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून मंगलेश बापट हा वकील नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कदाचित नवसरे यांनी असा अर्ज केला नसता तर बापट याची ही तोतयागिरी उजेडात आली नसती. न्यायव्यवस्थेत असे किती तोतया दडून बसलेले आहेत. यासाठी एकदा सर्जिकल स्टाईक होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय