शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांची मंगलमय तोतयागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:12 IST

‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोरों का, ये साथी है चोरों का बातों और दलीलों का, ये है खेल वकीलों का’ हे गीत आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोरों का, ये साथी है चोरों का बातों और दलीलों का, ये है खेल वकीलों का’ हे गीत आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘ये अंधा कानून है’ या चित्रपटातील. आज हे गीत आठवण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी (दि़२२) जिल्ह्यात एका तोतया वकिलाचा झालेला भांडाफोड. न्यायालयाने या वकिलावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या निमित्ताने मात्र न्यायदेवतेच्या डोळ्यात धुळफेक करून कशा तोतया आपले इप्सित कशा पद्धतीने साध्य करतात हे समोर आले आहे.वकिल असल्याचा डंका पिटवून न्यायालयात वकिली करणाऱ्या कर्जत येथील मंगलेश भालचंद्र बापट या तोतयाचा तब्बल आठरा वर्षानंतर भंडाफोड झाला. गेली अठरा वर्षे बापट याने तालुक्यापासून ते जिल्हा व उच्च न्यायालयातही वकिली केली. आरोपी, फिर्यादींच्यावतीने बाजू लढविली. प्रत्यक्षात मात्र त्याच्या वकिलीची सनदच बनावट असल्याचे समोर आले. काळ्या कोटाच्या मागे दडलेल्या या तोतयाने किती जणांना न्याय दिला आणि किती सर्वसामान्यांना लुबाडले याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. बापट १८ वर्षे वकिली करत होता. ही बाब कुणाच्याच कशी निदर्शनास आली नाही. न्यायमंदिरात सत्य मांडून निरपेक्ष न्यायदानाला मदत करणे हे खरे वकिलांचे काम. पदवी आणि सनद घेतल्यानंतर वकिली व्यवसाय करता येते. बापट याने मात्र बनावट कागदपत्रांच्या अधारे सनद घेत न्यायाव्यवस्थेची चेष्टाच केली आहे़ ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने त्यांची प्रकरणे वकिलांकडे देतात. आपल्याला न्याय मिळावा, हिच त्यांची अपेक्षा असते. यासाठी ते वकिल सांगेल ती फी देण्याचा प्रयत्न करतात. वकिली व्यवसायात मात्र असे तोतया आले तर कुणाच्या माध्यमातून न्याय मागायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृन खून झाला तेव्हा हाच बापट आरोपींची बाजू लढण्यासाठी पुढे धावला होता. त्याने जिल्हा न्यायालयात तसा अर्जही सादर केला होता. यावेळी आरोपींनी मात्र सरकारी वकिलांची मागणी केल्याने बापट या खटल्यापासून दूर झाला. युवराज हनुमंत नवसरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून मंगलेश बापट हा वकील नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कदाचित नवसरे यांनी असा अर्ज केला नसता तर बापट याची ही तोतयागिरी उजेडात आली नसती. न्यायव्यवस्थेत असे किती तोतया दडून बसलेले आहेत. यासाठी एकदा सर्जिकल स्टाईक होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय