शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 10:38 IST

पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो.

अनिल लगडअहमदनगर : पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो. ही आपत्ती मानव आपल्या चुकांमुळेच ओढून घेत आहे. या चुकांमुळे निसर्गचक्र बदलून गेले आहे. त्यामुळे भूकंप, पूर, वादळ, सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यातून आजकाल जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. भूकंपाच्या बाबतीत अचूक अंदाज बांधणे आजही कठीण आहे. परंतु संशोधनातून किंवा प्राणी, पक्षी, वातावरणीय बदलातून भूगर्भातील हालचालींचे अंदाज बांधले जातात. वातावरणीय बदलावर अनेक शास्त्रज्ञ जगात अभ्यास करीत आहेत. भूकंपाचे पूर्वानुमान प्राणी, पक्षी, मासे, कीटक, मानवाच्या हालचालीवरुन कसे करता येईल याच्या संवेदना नगर शहरातील सुधाकर विठ्ठल केदारी जाणतात. त्यांना पशू-पक्ष्यांप्रमाणे भूकंपाच्या संवेदना जाणवतात.केदारी यांनी आता वयाची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म १६ जून १९४० मध्ये झाला. त्यांनी प्रारंभी दूरसंचार खात्यात नोकरी केली. लाईन इन्स्पेक्टर पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे. दूरसंचारमध्ये असताना त्यांनी भूगर्भातील हालचालींविषयी अभ्यासासाठी सुरूवात केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली. शेतकºयांना भूजल स्त्रोताची माहिती दिली. जमिनीतील खडकांच्या प्रकाराचा अभ्यास करुन जमिनीतील खडकांच्या थरांचा अभ्यास केला. पाऊस, हवामान याविषयीही ते माहिती सहज देतात. त्यांनी सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुधीर दत्तात्रय फडके यांना या अभ्यासाविषयी माहिती दिली. फडके यांनी नांदेडचे डॉ. रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केदारी यांच्या अनुभवाचे बोल ‘शोध भूकंपाचा’ या पुस्तकात शब्दबध्द केले. यातून केदारी यांना उभारी मिळाली. त्यातून त्यांनी आपल्या भूगर्भाच्या हालचालींचा अभ्यास सुरूच ठेवला. केदारी यांनी राजकीय, प्रशासकीय, शास्त्रज्ञांना देखील याची माहिती दिलीच, परंतु लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचे काम देखील केले. अजूनही हे कार्य सुरूच आहे. नगरमधील माध्यमांनी देखील त्यांना अनेकदा व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजही जगात कोठेही विनाशकारी भूकंप आला किंवा नगर जिल्ह्यातील बोटा, संगमनेरमध्ये भूकंपाचे धक्के जरी बसले तरी केदारी हे माध्यमांना ते का झाले? याची माहिती स्वत: फोनवरुन देत असतात.मानवाने निसर्गाशी फारकत घेतल्यामुळे फार मोठ्या नुकसानीस आपण जबाबदार आहोत. निसर्गाचा अभ्यास, निसर्ग सानिध्य व निसर्गातील बदलांची, हालचालींची सतत निरीक्षणे व भूगर्भातील सूक्ष्म हालचालींची नोंद या निकषांव्दारे भूकंपाच्या संवेदना केदारी यांना आजही जाणवतात. त्यांनी याबाबत अनेक शास्त्रज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करून याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची अद्याप कोणीही गंभीरपणे दखल घेतली नाही, याची खंत केदारी हे नेहमी व्यक्त करतात. भूकंप, त्सुनामी, ग्लोबल वार्मिंग, वादळे अशा विनाशी आपत्तीच्या संदर्भातील उपाययोजनांसाठी आणि त्यातील लोकसहभागासाठी केदारी यांचे प्रयत्न मार्गी लागावेत, हीच अपेक्षा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर