शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भूकंपाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 10:38 IST

पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो.

अनिल लगडअहमदनगर : पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो. ही आपत्ती मानव आपल्या चुकांमुळेच ओढून घेत आहे. या चुकांमुळे निसर्गचक्र बदलून गेले आहे. त्यामुळे भूकंप, पूर, वादळ, सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यातून आजकाल जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. भूकंपाच्या बाबतीत अचूक अंदाज बांधणे आजही कठीण आहे. परंतु संशोधनातून किंवा प्राणी, पक्षी, वातावरणीय बदलातून भूगर्भातील हालचालींचे अंदाज बांधले जातात. वातावरणीय बदलावर अनेक शास्त्रज्ञ जगात अभ्यास करीत आहेत. भूकंपाचे पूर्वानुमान प्राणी, पक्षी, मासे, कीटक, मानवाच्या हालचालीवरुन कसे करता येईल याच्या संवेदना नगर शहरातील सुधाकर विठ्ठल केदारी जाणतात. त्यांना पशू-पक्ष्यांप्रमाणे भूकंपाच्या संवेदना जाणवतात.केदारी यांनी आता वयाची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म १६ जून १९४० मध्ये झाला. त्यांनी प्रारंभी दूरसंचार खात्यात नोकरी केली. लाईन इन्स्पेक्टर पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे. दूरसंचारमध्ये असताना त्यांनी भूगर्भातील हालचालींविषयी अभ्यासासाठी सुरूवात केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली. शेतकºयांना भूजल स्त्रोताची माहिती दिली. जमिनीतील खडकांच्या प्रकाराचा अभ्यास करुन जमिनीतील खडकांच्या थरांचा अभ्यास केला. पाऊस, हवामान याविषयीही ते माहिती सहज देतात. त्यांनी सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुधीर दत्तात्रय फडके यांना या अभ्यासाविषयी माहिती दिली. फडके यांनी नांदेडचे डॉ. रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केदारी यांच्या अनुभवाचे बोल ‘शोध भूकंपाचा’ या पुस्तकात शब्दबध्द केले. यातून केदारी यांना उभारी मिळाली. त्यातून त्यांनी आपल्या भूगर्भाच्या हालचालींचा अभ्यास सुरूच ठेवला. केदारी यांनी राजकीय, प्रशासकीय, शास्त्रज्ञांना देखील याची माहिती दिलीच, परंतु लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचे काम देखील केले. अजूनही हे कार्य सुरूच आहे. नगरमधील माध्यमांनी देखील त्यांना अनेकदा व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजही जगात कोठेही विनाशकारी भूकंप आला किंवा नगर जिल्ह्यातील बोटा, संगमनेरमध्ये भूकंपाचे धक्के जरी बसले तरी केदारी हे माध्यमांना ते का झाले? याची माहिती स्वत: फोनवरुन देत असतात.मानवाने निसर्गाशी फारकत घेतल्यामुळे फार मोठ्या नुकसानीस आपण जबाबदार आहोत. निसर्गाचा अभ्यास, निसर्ग सानिध्य व निसर्गातील बदलांची, हालचालींची सतत निरीक्षणे व भूगर्भातील सूक्ष्म हालचालींची नोंद या निकषांव्दारे भूकंपाच्या संवेदना केदारी यांना आजही जाणवतात. त्यांनी याबाबत अनेक शास्त्रज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करून याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची अद्याप कोणीही गंभीरपणे दखल घेतली नाही, याची खंत केदारी हे नेहमी व्यक्त करतात. भूकंप, त्सुनामी, ग्लोबल वार्मिंग, वादळे अशा विनाशी आपत्तीच्या संदर्भातील उपाययोजनांसाठी आणि त्यातील लोकसहभागासाठी केदारी यांचे प्रयत्न मार्गी लागावेत, हीच अपेक्षा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर