शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’ सुरु

By साहेबराव नरसाळे | Updated: September 21, 2018 11:54 IST

स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे विसराळूपणावर आता शासकीय उपचार मिळणार आहेत.केंद्र सरकारने १९८२ पासून देशभरात नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरु केला़ त्यानुसार महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरु करण्यात आली.  मात्र, जिल्हास्तरावर या आजाराचे निदान आणि उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे स्मृतीभं्रश आजाराचे प्रमाण वाढत होते. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते किंवा वरील मनोरुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत होते. त्यामुळे ७ जानेवारी रोजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य सहसंचालकांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जागतिक स्मृतीभ्रंश दिनाचे औचित्य साधून हे मेमरी क्लिनिक सुरु करण्यात येत आहेत. रुग्णांची प्राथमिक तपासणी करून आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना औषधेही जिल्हा रुग्णालयातून पुरविले जातील.

00 प्रत्येक मेमरी क्लिनिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, फिजिशीयन अशा तीन तज्ज्ञांचे पॅनल नियुक्त करण्यात आले आहे.00 त्यांच्या मदतीसाठी मनोविकार परिचारिका, मनोविकार क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, आहारतज्ज्ञ असणार आहेत.

एडीआयने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये भारतात ४१ लाख लोक स्मृतीभ्रंश आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, केवळ १० टक्के रुग्ण या आजारावर उपचार घेऊ शकतात.  आता राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवर मेमरी क्लिनिक सुरु झाल्यामुळे अशा रुग्णांना उपचार मिळणे सोपे होणार आहे. -डॉ. अशोक कराळे, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय