शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

कोरोनाकाळात ३६ डॉक्टरांनी सोडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ...

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार देत राजीनामे दिले.

जिल्हा परिषदेला डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांतील अनेक पदे रिक्त राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेत एमबीबीएस डॉक्टरांच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून वर्षभरात २२ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यापैकी १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले. या डॉक्टरांची ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी राजीनामे दिल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७ डॉक्टरांच्याही नियुक्त्या जिल्हा परिषदेत केल्या गेल्या. यापैकी १३ डॉक्टर सध्या कार्यरत असून, उर्वरित ४ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती केली. आरोग्य विभागाने कोरोनाकाळात ७२ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती असून, यापैकी ५५ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १७ बीएएमएस डॉक्टरांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१३ पदे आहेत. या पदांवर कायमस्वरूपी नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी असते; परंतु त्यापूर्वीच अनेक जण सोडून जातात. त्यामुळे पदे रिक्त होतात. रिक्त झालेल्या पदांवर तातडीने जाहीरातीव्दारे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे पदे रिक्त झालेली नाहीत. आरोग्य सेवा खंडित होणार नाही, यासाठी ही काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

....

कोरोनाकाळातील नियुक्त्या

जिल्हा प्रशासनाकडून - २२

नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७

बीएएमएस- ७२

...

हजर झालेले -७५

राजीनामे दिलेले -३६

......

अभ्यासाचे कारण देत राजीनामा

जिल्हा परिषदेत कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील शिक्षण सुरू असून, अभ्यास करण्यासाठी राजीनामा देत आहे, असे कारण बहुुतांश डॉक्टरांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.

....

जिल्हा परिषदेत एकही पद रक्त नाही

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने बीएएमस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यामुळे या काळात जिल्हा परिषदेचे एकही पद रिक्त नाही. कोरोना नसताना पदे रिक्त होती; परंतु कोरोनाकाळात आरोग्य सेवा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने डॉक्टरांची भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

....