शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात ३६ डॉक्टरांनी सोडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ...

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार देत राजीनामे दिले.

जिल्हा परिषदेला डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांतील अनेक पदे रिक्त राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेत एमबीबीएस डॉक्टरांच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून वर्षभरात २२ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यापैकी १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले. या डॉक्टरांची ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी राजीनामे दिल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७ डॉक्टरांच्याही नियुक्त्या जिल्हा परिषदेत केल्या गेल्या. यापैकी १३ डॉक्टर सध्या कार्यरत असून, उर्वरित ४ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती केली. आरोग्य विभागाने कोरोनाकाळात ७२ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती असून, यापैकी ५५ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १७ बीएएमएस डॉक्टरांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१३ पदे आहेत. या पदांवर कायमस्वरूपी नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी असते; परंतु त्यापूर्वीच अनेक जण सोडून जातात. त्यामुळे पदे रिक्त होतात. रिक्त झालेल्या पदांवर तातडीने जाहीरातीव्दारे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे पदे रिक्त झालेली नाहीत. आरोग्य सेवा खंडित होणार नाही, यासाठी ही काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

....

कोरोनाकाळातील नियुक्त्या

जिल्हा प्रशासनाकडून - २२

नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७

बीएएमएस- ७२

...

हजर झालेले -७५

राजीनामे दिलेले -३६

......

अभ्यासाचे कारण देत राजीनामा

जिल्हा परिषदेत कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील शिक्षण सुरू असून, अभ्यास करण्यासाठी राजीनामा देत आहे, असे कारण बहुुतांश डॉक्टरांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.

....

जिल्हा परिषदेत एकही पद रक्त नाही

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने बीएएमस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यामुळे या काळात जिल्हा परिषदेचे एकही पद रिक्त नाही. कोरोना नसताना पदे रिक्त होती; परंतु कोरोनाकाळात आरोग्य सेवा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने डॉक्टरांची भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

....