शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला

By अरुण वाघमोडे | Updated: October 17, 2023 17:31 IST

Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- अरुण वाघमोडे अहमदनगर - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत मनपात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश कवडे यांच्यासह सभागृह नेते विनित पाऊलबुधे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदिप परदेशी, नज्जू पैलवान, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानातंर्गत महापालिकेला सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी आलेला ४ कोटींचा निधी शासनाकडे परत कसा गेला, याला जबाबदार कोण तसेच याबाबत आपण काय कारवाई केली. असा प्रश्न नगरसेवक पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे यांनी निधी खर्च करण्यासाठी वेळ कमी होता व जागा निश्चित झाली नाही. तसेच आधी घनकचरा विभाग दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. असे उत्तर दिले. यावर सभापती कवडे यांच्यासह पाऊबुले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाकडून आलेल्या निधीबाबत अधिकारी पदाधिकाऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच निधीचा योग्य व वेळेत विनियोग करत नाहीत. त्यामुळेच हा निधी परत गेला. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी पाऊलबुधे यांनी केली. यावर सभापती कवडे यांनी आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर