शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला

By अरुण वाघमोडे | Updated: October 17, 2023 17:31 IST

Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- अरुण वाघमोडे अहमदनगर - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत मनपात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश कवडे यांच्यासह सभागृह नेते विनित पाऊलबुधे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदिप परदेशी, नज्जू पैलवान, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानातंर्गत महापालिकेला सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी आलेला ४ कोटींचा निधी शासनाकडे परत कसा गेला, याला जबाबदार कोण तसेच याबाबत आपण काय कारवाई केली. असा प्रश्न नगरसेवक पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे यांनी निधी खर्च करण्यासाठी वेळ कमी होता व जागा निश्चित झाली नाही. तसेच आधी घनकचरा विभाग दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. असे उत्तर दिले. यावर सभापती कवडे यांच्यासह पाऊबुले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाकडून आलेल्या निधीबाबत अधिकारी पदाधिकाऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच निधीचा योग्य व वेळेत विनियोग करत नाहीत. त्यामुळेच हा निधी परत गेला. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी पाऊलबुधे यांनी केली. यावर सभापती कवडे यांनी आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर