शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

'राजकीय वादांमुळे ग्रामविकासाला खीळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:15 IST

अण्णा हजारे : सरपंच ग्रामसंसदेचा राळेगणसिद्धीत समारोप

पारनेर (जि.अहमदनगर) : प्रत्येक गावात राजकीय पक्षांचे राजकारण शिरल्याने गावच्या विकासात खीळ बसत आहे. सरपंचांनी पक्ष विरहित निवडणूक लढविली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धीत दोन दिवशीय सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यशाळेच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करीत असेल तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण राजकीय पक्षांमुळे गावातील लोक दोन गटात विभागले गेलेले आहेत. यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत.

सरपंच ग्रामसंसद महासंघाचे सरचिटणीस दत्ता आवारी म्हणाले, राज्यात सरपंच कार्यशाळा घेऊन हजारे यांचे विचार गावागावात पोहोचविणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष सरपंच कैलास पटारे, महिला उपाध्यक्ष सरपंच रोहिणी गाजरे, संघटक सरपंच प्रविण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे यांच्यासह राज्यातील बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, अहमदनगर, पुणे, हिंगोली, सातारा, बीड जिल्ह्यातील सरपंचांसह इतर जिल्ह्यातील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पक्षविरहीत निवडणूक लढवाकाही लोक पक्ष व गटातटामागे लागून सरपंच होतात. असे न करता गावातील लोकांनी पक्षविरहीत निवडणूक लढविल्यास खऱ्या अर्थाने गावाचा व देशाचा विकास होईल, असे मत अण्णा हजारे यांनी मांडले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेPoliticsराजकारण