शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मित्रावरील प्रेमामुळे बहिरोबावाडी ग्रामस्थांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 12:50 IST

सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

ठळक मुद्दे मयत मित्राच्या मुलाच्या नावे एक लाखाची ठेव आईला दिले २५ हजार रुपये रोख बहिरोबावाडी ग्रामस्थांनी मानले आभार

कर्जत : सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. ग्रामस्थांनी या मित्रांचे आभार मानून ग्रामस्थांनीही या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.मंगळवारी ऐन दुपारची वेळ होती. रखरखते उन.. रस्ता निर्मुनष्य, ओसाड पडला होता. कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे अहमदनगर, सोलापूर, पुणे, बीड, नाशिक, धुळे या जिल्ह्यातील पंधरा सुशिक्षित तरूण येतात आणि वाडीमधील एका व्यक्तीचे घर कोठे आहे अशी विचारणा करतात. ज्या व्यक्तीच्या घराचा पत्ता हे विचारणा करतात.. तो त्यांचा अठरा वर्षापूर्वीचा मित्र होता. त्याचे नाव कै. बळीराम पेटकर होय. मागील महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे या बळीराम पेटकर या तरूण शिक्षकाचे अपघाती निधन झाले होते आणि त्याला भेटण्यासाठी आलेले हे सर्व जण सन २००० साली पुणे येथील महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर येथे एकत्र शिकत होते. यानंतर या सर्वांचा एकमेकांशी फोनवरून होता तेवढाच काय तो संपर्क . ज्या मित्राचे निधन झाले तो बळीराम हा अतिशय गरीब होता. घर पाहिले तर आजच्या काळातही बळीरामचे घर छपराचे होते. त्याची पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार यामध्ये रहात आहे.मित्राच्या अपघाती निधनाची माहिती या मित्रांना समजली. घरचा कर्ता मुलगा गेल्याने सर्व कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे या मित्राच्या कुटुंबाला आधार देण्याचा या सर्व मित्रांनी निर्धार केला आणि यासाठी ते सर्व जण बहिरोबावाडी येथे आले होते. त्यांनी मयत शिक्षक मित्राच्या मुलाच्या नावावर बँकेमध्ये एक लाखाची ठेव ठेवल्याची पावती आणि आईला २५ हजार रुपये रोख दिले. यावेळी त्या सर्वांनी आमचा मित्र आम्ही गमावला आहे हे नुकसान भरून येणारे नाही. आम्ही करीत आहोत ते आमचं कर्तव्य आहे. आम्हाला त्याची प्रसिध्दी नको आहे हे सांगताना सर्व जण भावनिक झाले होते. प्रत्येक मित्राच्या डोळ्याच्या कडा आठवणीने ओल्या झाल्या होत्या. हे सर्व दृष्य पाहून गावचे सरंपच विजय तोरडमल, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर व उपस्थित ग्रामस्थ भावनिक झाले होते.२० वर्षापूर्वीच्या मित्राच्या दुर्घटनेनंतर त्याच्या कुटुंबाचे दु:ख कमी व्हावे म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी आलेले हे सर्व मित्र व त्यांनी मैत्रीचे जपलेले नाते व सामाजिक बांधिलकी हे सर्व समाजाला एक प्रेरणा देणारा प्रसंग आहे. यावेळी सरंपच आणि ग्रामस्थांनी आलेल्या सर्व मित्रांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावून आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत