शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:51 IST

निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला.

अहमदनगर : निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला. देहरे , विळद, वडगाव गुप्ता अशा सखल भागातील गावांनाही या जलसंधारणाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे लाभ होणार आहे.निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या लढ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आपले आजोळ असलेल्या निंबळक आणि इसळक गावांच्या पंचक्रोशीला पाणीदार करण्यासाठी पहिली मदत म्हणून एक महिन्याचे १५ हजार रुपयांचे निवृत्तीवेतन अण्णांनी दिले. या उदघाटन सोहळ्यात आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक कौस्तुभ आमटे , भारतीय जैन संघटनेचे नगर जिल्हा समन्वयक आदेश चंगेडिया, आमी संघटनेचे दिलीप अकोलकर , दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे नगर जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. श्याम असावा, तुलसीराम पालीवाल आदी उपस्थित होते.यावेळी अण्णा हजारे म्हणाले, उशिराने का होईना, परंतु लोकांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आपणच रक्त आणि घाम गाळायचा आहे, याची जाणीव झालेली आहे. जाती-धर्म- राजकीय पक्षांचे भेदाभेद गाडून, जी गावे एकजुटीने पाणी, शेती ,माती आणि संस्कृती यांचे संवर्धन करतील त्यांनाच भविष्य राहील. पाणी ही संपूर्ण देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचा समान अधिकार सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे. तसेच पाण्याचा वापर करण्याबाबत तारतम्य आणि काटकसर अनुसरण्याची भविष्यात गरज आहे.अन्यथा पाणीदार गावे पुन्हा दुष्काळी होण्याचा धोका आहे, असेही अण्णा म्हणाले.पोपटराव पवार म्हणाले, मोठ्या धरणांनी मोठ्या महानगरांचे पिण्याच्या पाण्याचे आणि औद्योगिक गरजांचे प्रश्न सोडविले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी क्षेत्र आणि बेसाल्ट खडकाच्या जमिनीत नुसते काबाडकष्ट न करता तंत्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा विचार न करता नुसतेच खुदाई केल्याने आहे ते पाणी दुसरीकडे जाते असे अनुभव आहेत.श्रीमंत लोक अधिकाधिक पाण्याचा उपसा करून स्वत:चे उखळ पांढरे करतात. त्यामुळे देशात आणि ग्रामीण भागात आर्थिक विषमता निर्माण होते. अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी आणि विस्थापित होतो.पाणी वापराबाबत समन्यायी दृष्टिकोन आणि आठमाही शेतीचा आग्रह धरणे गरजेचे आहे..

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर