शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:51 IST

निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला.

अहमदनगर : निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला. देहरे , विळद, वडगाव गुप्ता अशा सखल भागातील गावांनाही या जलसंधारणाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे लाभ होणार आहे.निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या लढ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आपले आजोळ असलेल्या निंबळक आणि इसळक गावांच्या पंचक्रोशीला पाणीदार करण्यासाठी पहिली मदत म्हणून एक महिन्याचे १५ हजार रुपयांचे निवृत्तीवेतन अण्णांनी दिले. या उदघाटन सोहळ्यात आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक कौस्तुभ आमटे , भारतीय जैन संघटनेचे नगर जिल्हा समन्वयक आदेश चंगेडिया, आमी संघटनेचे दिलीप अकोलकर , दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे नगर जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. श्याम असावा, तुलसीराम पालीवाल आदी उपस्थित होते.यावेळी अण्णा हजारे म्हणाले, उशिराने का होईना, परंतु लोकांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आपणच रक्त आणि घाम गाळायचा आहे, याची जाणीव झालेली आहे. जाती-धर्म- राजकीय पक्षांचे भेदाभेद गाडून, जी गावे एकजुटीने पाणी, शेती ,माती आणि संस्कृती यांचे संवर्धन करतील त्यांनाच भविष्य राहील. पाणी ही संपूर्ण देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचा समान अधिकार सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे. तसेच पाण्याचा वापर करण्याबाबत तारतम्य आणि काटकसर अनुसरण्याची भविष्यात गरज आहे.अन्यथा पाणीदार गावे पुन्हा दुष्काळी होण्याचा धोका आहे, असेही अण्णा म्हणाले.पोपटराव पवार म्हणाले, मोठ्या धरणांनी मोठ्या महानगरांचे पिण्याच्या पाण्याचे आणि औद्योगिक गरजांचे प्रश्न सोडविले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी क्षेत्र आणि बेसाल्ट खडकाच्या जमिनीत नुसते काबाडकष्ट न करता तंत्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा विचार न करता नुसतेच खुदाई केल्याने आहे ते पाणी दुसरीकडे जाते असे अनुभव आहेत.श्रीमंत लोक अधिकाधिक पाण्याचा उपसा करून स्वत:चे उखळ पांढरे करतात. त्यामुळे देशात आणि ग्रामीण भागात आर्थिक विषमता निर्माण होते. अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी आणि विस्थापित होतो.पाणी वापराबाबत समन्यायी दृष्टिकोन आणि आठमाही शेतीचा आग्रह धरणे गरजेचे आहे..

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर