शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आल्याने टँकरच्या संख्येत घट

By admin | Updated: July 25, 2014 00:25 IST

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़ पावसाचा जोर कायम राहिल्यास ही संख्या आणखी कमी होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी व्यक्त केली़मागीलवर्षी जिल्ह्यात ११९ टक्के पाऊस पडला होता़ मात्र चालूवर्षी जून अखेर पाऊस पडला नाही़ त्यामुळे जिल्ह्यात ३६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे़ दोन्ही धरणांत सरासरी २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अकोले व श्रीरामपूर शहरासाठी सुरू असलेले सात टँकर बंद झाले आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या ३६९ वरून ३६२ वर खाली आली आहे़ पाऊस पडल्याने या परिसरात टँकरची आवश्यकता राहिलेली नाही़ पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे़ सार्वत्रिक पावसाची आवश्यकता असून, पेरणीच्या कामाला वेग आला असल्याचे कवडे यांनी सांगितले़पाऊस न पडल्यास पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा सप्टेंबरपर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ दक्षिणेतील श्रीगोंदा,पारनेर आणि कर्जतसाठी कुकडी धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़तर कोपरगाव व शिर्डीसाठी दारणा धरणातून ७० दलघफू पाण्याची मागणी आहे़ दारणात नवीन पाण्याची आवक झाल्याने तेथून पाणी उपलब्ध होईल़ तसेच ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)विद्यापीठात ४०० एकरवर पेरणी सुरूजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे़ मात्र पाऊस न पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून राहुरी कृषी विद्यापीठात ४०० एकरवर कडवळाची पेरणी करण्याचे काम सुरू झाले़ मुळा धरणातून त्यासाठी पाणी दिले जाणार आहे़ याबाबत शासनाकडे ४२ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़शेतसारा भरल्यास जमीन हस्तांतरण शक्यकूळ कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या आहेत़ मात्र त्यांना या जमिनीचे हस्तांतराचा हक्क प्राप्त झालेला नाही़ शासनाने याविषयी नवीन अध्यादेश नुकताच जारी केला आहे़ त्यानुसार १ जुलै २००४ पर्यंत ज्या शेतकऱ्यांना ३२ एम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी शेतसाऱ्याच्या ४० पट रक्कम भरून हा हक्क प्राप्त करून घ्यावा़ येत्या ३१ जुलैपर्यंत ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी कवडे यांनी सांगितले़