शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पाऊस आल्याने टँकरच्या संख्येत घट

By admin | Updated: July 25, 2014 00:25 IST

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़ पावसाचा जोर कायम राहिल्यास ही संख्या आणखी कमी होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी व्यक्त केली़मागीलवर्षी जिल्ह्यात ११९ टक्के पाऊस पडला होता़ मात्र चालूवर्षी जून अखेर पाऊस पडला नाही़ त्यामुळे जिल्ह्यात ३६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे़ दोन्ही धरणांत सरासरी २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अकोले व श्रीरामपूर शहरासाठी सुरू असलेले सात टँकर बंद झाले आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या ३६९ वरून ३६२ वर खाली आली आहे़ पाऊस पडल्याने या परिसरात टँकरची आवश्यकता राहिलेली नाही़ पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे़ सार्वत्रिक पावसाची आवश्यकता असून, पेरणीच्या कामाला वेग आला असल्याचे कवडे यांनी सांगितले़पाऊस न पडल्यास पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा सप्टेंबरपर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ दक्षिणेतील श्रीगोंदा,पारनेर आणि कर्जतसाठी कुकडी धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़तर कोपरगाव व शिर्डीसाठी दारणा धरणातून ७० दलघफू पाण्याची मागणी आहे़ दारणात नवीन पाण्याची आवक झाल्याने तेथून पाणी उपलब्ध होईल़ तसेच ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)विद्यापीठात ४०० एकरवर पेरणी सुरूजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे़ मात्र पाऊस न पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून राहुरी कृषी विद्यापीठात ४०० एकरवर कडवळाची पेरणी करण्याचे काम सुरू झाले़ मुळा धरणातून त्यासाठी पाणी दिले जाणार आहे़ याबाबत शासनाकडे ४२ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़शेतसारा भरल्यास जमीन हस्तांतरण शक्यकूळ कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या आहेत़ मात्र त्यांना या जमिनीचे हस्तांतराचा हक्क प्राप्त झालेला नाही़ शासनाने याविषयी नवीन अध्यादेश नुकताच जारी केला आहे़ त्यानुसार १ जुलै २००४ पर्यंत ज्या शेतकऱ्यांना ३२ एम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी शेतसाऱ्याच्या ४० पट रक्कम भरून हा हक्क प्राप्त करून घ्यावा़ येत्या ३१ जुलैपर्यंत ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी कवडे यांनी सांगितले़