शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अण्णांची प्रकृती खालावल्याने राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:46 IST

गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत.

एकनाथ भालेकरराळेगणसिद्धी : गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत. आपण अण्णांना वाचवलं पाहिजे, असा चिंताक्रांत सूर ग्रामस्थांतून उमटत आहे. रोज होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.सध्या अण्णांचे वय ८० असल्याने वृद्धापकाळात अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामस्थांचा आग्रह होता. परंतु, शेतक-यांचे व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत अण्णांनी २३ मार्चपासून रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आहे. अण्णांचे उपोषण लवकर सुटावे यासाठी २३ मार्चपासून राळेगणसिद्धीत रोज आंदोलने व ग्रामसभा सुरू आहेत. सर्वच महिला - पुरूष या आंदोलनात सहभागी होतात.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्राचा मसुदा घेऊन अण्णांकडे गेल्यावर ग्रामस्थांना अण्णांचे उपोषण सुटेल अशी आशा मंगळवारी ( दि. २६ ) वाटली होती. परंतु, मागण्या मान्य होत नसल्याने अण्णांनी प्राण असेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला. त्यात त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अण्णांचे ज्येष्ठ सहकारी सावळेराम पठारे म्हणाले की, अण्णांनी त्यांचा प्रपंच खूप मोठा केला आहे. ते नेहमी देश व समाजाचाच विचार करतात. या मतलबी सरकारला अण्णांची काहीच काळजी नाही. आम्हाला अण्णा पाहिजेत. एक वेळ मागण्या जरी मंजूर झाल्या नाही तरी अण्णांनी राळेगणला यावे. आमच्यासाठी अण्णा देव आहेत. त्यांनी आमच्यासाठी खूप केले आहे. आमच्या गावाला त्यांनी एक ओळख दिली. अण्णांचे बंधू मारूती हजारे म्हणाले, अण्णांचे उपोषण लवकर सुटावे, ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. सरकारने जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाही तर त्यांच्या अगोदर मीच माझा प्राण त्याग करील. अण्णा टीव्हीवर दिसत नसल्याने खूप चिंता वाटते. वर्तमानपत्रातच फक्त वाचायला मिळते.टीव्हीवर थोडे फार जरी दिसले तरी समाधान वाटेल. मागण्या जरी मंजूर झाल्या नाहीतरी अण्णांनी आपले उपोषण मागे घेऊन अन्य मार्गांचा अवलंब करून सरकारची कोंडी करावी.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर