शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे ५ एकरमधील ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:36 IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजेंद्र पांडुरंग वने यांचा दीड एकर तर, दीपक पांडुरंग वने यांचा अर्धा एकर, बाळकृष्ण गायकवाड यांचा एक एकर, राधुजी गायकवाड वीस गुंठे ऊस सोमवारी दुपारी जळाला. हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. त्यामुळे ठिबक साहित्य आगीपासून बचावले. मंगळवारी सायंकाळी निलेश बाळासाहेब शिंदे यांचा सुमारे एक एकर ऊस ठिबकसह जळाला. मात्र, परिसरातील ग्रामस्थांमुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याने शेजारील शेतक-यांचा ऊस वाचला. परिसरात बहुतेक वीज खांबांवरील तारा खाली असल्याने ऊस जळण्याची भीती शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.

वीज तारांचे एकमेकांना घर्षण होऊन तीस गुंठे ऊस जळाला. परिसरातील तरुणांनी धावपळ करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला, अन्यथा शेजारील शेतक-यांचा ऊस जळाला असता. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी.-निलेश शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी.

घटना होण्यापूर्वी महावितरणच्या कर्मचा-याने वीज रोहित्रावर काम केले. मात्र, काम गांभीर्यपूर्वक न केल्याने ठिणगी पडून ऊस जळून खाक झाला. या नुकसानीची आम्हाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी.-दीपक वने, नुकसानग्रस्त शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी