शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे ५ एकरमधील ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:36 IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजेंद्र पांडुरंग वने यांचा दीड एकर तर, दीपक पांडुरंग वने यांचा अर्धा एकर, बाळकृष्ण गायकवाड यांचा एक एकर, राधुजी गायकवाड वीस गुंठे ऊस सोमवारी दुपारी जळाला. हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. त्यामुळे ठिबक साहित्य आगीपासून बचावले. मंगळवारी सायंकाळी निलेश बाळासाहेब शिंदे यांचा सुमारे एक एकर ऊस ठिबकसह जळाला. मात्र, परिसरातील ग्रामस्थांमुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याने शेजारील शेतक-यांचा ऊस वाचला. परिसरात बहुतेक वीज खांबांवरील तारा खाली असल्याने ऊस जळण्याची भीती शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.

वीज तारांचे एकमेकांना घर्षण होऊन तीस गुंठे ऊस जळाला. परिसरातील तरुणांनी धावपळ करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला, अन्यथा शेजारील शेतक-यांचा ऊस जळाला असता. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी.-निलेश शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी.

घटना होण्यापूर्वी महावितरणच्या कर्मचा-याने वीज रोहित्रावर काम केले. मात्र, काम गांभीर्यपूर्वक न केल्याने ठिणगी पडून ऊस जळून खाक झाला. या नुकसानीची आम्हाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी.-दीपक वने, नुकसानग्रस्त शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी