शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे ५ एकरमधील ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:36 IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ब्राह्मणी येथे दोन दिवसात पाच एकर ऊस जळाला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजेंद्र पांडुरंग वने यांचा दीड एकर तर, दीपक पांडुरंग वने यांचा अर्धा एकर, बाळकृष्ण गायकवाड यांचा एक एकर, राधुजी गायकवाड वीस गुंठे ऊस सोमवारी दुपारी जळाला. हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. त्यामुळे ठिबक साहित्य आगीपासून बचावले. मंगळवारी सायंकाळी निलेश बाळासाहेब शिंदे यांचा सुमारे एक एकर ऊस ठिबकसह जळाला. मात्र, परिसरातील ग्रामस्थांमुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याने शेजारील शेतक-यांचा ऊस वाचला. परिसरात बहुतेक वीज खांबांवरील तारा खाली असल्याने ऊस जळण्याची भीती शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.

वीज तारांचे एकमेकांना घर्षण होऊन तीस गुंठे ऊस जळाला. परिसरातील तरुणांनी धावपळ करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला, अन्यथा शेजारील शेतक-यांचा ऊस जळाला असता. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी.-निलेश शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी.

घटना होण्यापूर्वी महावितरणच्या कर्मचा-याने वीज रोहित्रावर काम केले. मात्र, काम गांभीर्यपूर्वक न केल्याने ठिणगी पडून ऊस जळून खाक झाला. या नुकसानीची आम्हाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी.-दीपक वने, नुकसानग्रस्त शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी