शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘भारत माता की जय’ म्हटल्याने दुष्काळ हटणार नाही

By admin | Updated: April 11, 2016 00:33 IST

अकोले : सरकार नुसती घोषणाबाजी करत असून, भारत माता की जय, असं म्हणून दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी द्यायला हवा,

अकोले : सरकार नुसती घोषणाबाजी करत असून, भारत माता की जय, असं म्हणून दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी द्यायला हवा, तसेच शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले. दूध, कांदा व पाणी टंचाई प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनिमित्त समशेरपूर येथे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार वैभव पिचड, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, सभापती अंजना बोंबले, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर आदी उपस्थित होते. पीक विम्याचा अकोले तालुक्याच्या वाट्याला एक छदामही आला नाही. निळवंडेला केवळ ३ कोटी मिळाले असून सरकारला निळवंडे धरणाचा साठवण तलाव करायचा विचार दिसतो. कालव्यांसह निळवंडे पूर्ण करण्यासाठी भरीव निधी न दिल्यास पुढच्या वर्षी निळवंडेतून थेंबभर पाणी लाभक्षेत्राकडे जाऊ देणार नाही, असा इशारा पिचड यांनी दिला. निळवंडेसाठी निधी मिळवून देतो, असे म्हणणारे भाजपा, सेनेचे खासदार कुठे गेले? असा सवाल उपस्थित करत युतीच्या थापाड्या पुढाऱ्यांना जवळ उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. निळवंडेच्या लाभक्षेत्रातील आमदारांना झोप लागली की काय? असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, परबत नाईकवाडी, के. बी. दराडे, पोपट दराडे, काळू भांगरे, कोंडाजी ढोन्नर, मीनानाथ पांडे, सोमनाथ मेंगाळ, रामनाथ सहाणे यांची भाषणे झाली. कासम मणियार यांनी सूत्रसंचालन, तर सचिन दराडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)