शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

‘भारत माता की जय’ म्हटल्याने दुष्काळ हटणार नाही

By admin | Updated: April 11, 2016 00:33 IST

अकोले : सरकार नुसती घोषणाबाजी करत असून, भारत माता की जय, असं म्हणून दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी द्यायला हवा,

अकोले : सरकार नुसती घोषणाबाजी करत असून, भारत माता की जय, असं म्हणून दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी द्यायला हवा, तसेच शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले. दूध, कांदा व पाणी टंचाई प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनिमित्त समशेरपूर येथे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार वैभव पिचड, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, सभापती अंजना बोंबले, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर आदी उपस्थित होते. पीक विम्याचा अकोले तालुक्याच्या वाट्याला एक छदामही आला नाही. निळवंडेला केवळ ३ कोटी मिळाले असून सरकारला निळवंडे धरणाचा साठवण तलाव करायचा विचार दिसतो. कालव्यांसह निळवंडे पूर्ण करण्यासाठी भरीव निधी न दिल्यास पुढच्या वर्षी निळवंडेतून थेंबभर पाणी लाभक्षेत्राकडे जाऊ देणार नाही, असा इशारा पिचड यांनी दिला. निळवंडेसाठी निधी मिळवून देतो, असे म्हणणारे भाजपा, सेनेचे खासदार कुठे गेले? असा सवाल उपस्थित करत युतीच्या थापाड्या पुढाऱ्यांना जवळ उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. निळवंडेच्या लाभक्षेत्रातील आमदारांना झोप लागली की काय? असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, परबत नाईकवाडी, के. बी. दराडे, पोपट दराडे, काळू भांगरे, कोंडाजी ढोन्नर, मीनानाथ पांडे, सोमनाथ मेंगाळ, रामनाथ सहाणे यांची भाषणे झाली. कासम मणियार यांनी सूत्रसंचालन, तर सचिन दराडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)