शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जमिनीतील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे फळबागांसह इतर पिके जळून ...

श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जमिनीतील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे फळबागांसह इतर पिके जळून चालली आहेत. शेतीसाठी कुकडीचे १५ एप्रिलपासून आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. कुकडी, विसापूर, घोड धरणे शंभर टक्के भरली. मात्र कुकडीच्या येडगाव धरणातून शेतीसाठी अवघे एकच आवर्तन सोडण्यात आले. ‘घोड’चे दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून विसापूरमधून ही १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.९) पुण्यात होणार आहे. या बैठकीत कुकडीच्या येडगाव धरणातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी आवर्तन न मिळाल्यास लाभक्षेत्रातील फळबागांसह इतर पिके जळून जातील.

--

कुकडीवर नेहमी अन्याय..

डिंभे, पिंपळगाव जोगे धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी पाण्याची तरतूद येडगाव धरणात तातडीने केली तर शेतीसाठी आवर्तन सुटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे.

-राजेंद्र म्हस्के,

अध्यक्ष, कुकडी घोड पाट पाणी समिती

--

०७ कुकडी

कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा तालुक्यातील पाण्याअभावी करपू लागलेल्या लिंबू बागा.