शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ...

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडावली आहे. यावर वैद्यकीय तपासणीचा मार्ग असला तरी तुलनेत कारवाईचे प्रमाण घटल्याने अनेक जण तर्राट होऊन वाहने चालविताना दिसतात.

दारू पिऊन वाहन चालविल्याने बहुतांश वेळा अपघात घडतात. अशा मद्यपी चालकांना शोधण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा चांगला उपयोग होतो. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक मद्यपींवर कारवाई करणे सोयीचे होते. मात्र हे यंत्र तोंडात घालून तपासणी केली जाते. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या यंत्राचा मागील दीड वर्षांपासून वाहतूक शाखेकडून वापर बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर पोलिसांनी एखादा मद्यपी वाहन चालक पकडला तर त्याची शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असते. या अडचणीमुळे कोरोना काळात मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. २०२० या वर्षात जिल्ह्यात १ हजार ३५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यातील सत्तर टक्के कारवाई या पहिल्या तीन महिन्यात झालेल्या आहेत. कोराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे.

--------------------------

मास्कमुळे मद्यपी लक्षात येत नाहीत

कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. ब्रेथ ॲनालायझरचा वापरही बंद आहे. त्यामुळे मद्य प्राशन केलेला वाहनचालक सहजासहजी निदर्शनास येत नाही. त्यामुळे कारवाईचे प्रमाण घडले आहे. एखाद्या मद्यपी चालकाला पकडल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली जाते. त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून न्यायालयात पाठविले जाते. न्यायालयातून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते.

------------------------

कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरास बंदी असल्याने मागील तुलनेत कारवाईचे प्रमाण घटले आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यपी वाहन चालकांची रुग्णालयात तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

- विकास देवरे, नगर शहर वाहतूक निरीक्षक

--------------

कोरोनाकाळातही अपघात वाढले

मागील दीड वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी १ हजार ८१९ अपघात झाले. यात ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८३८ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांशी अपघात हे मद्यपी वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत.