शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:55 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला.

अहमदनगर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला.केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल.जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनीही पथकाशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.पथक जिल्ह्यात आज दुपारी औरंगाबाद मार्गे दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील विष्णु शंकर सातपुते या शेतक-यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कपाशी आणि तूर पिकाची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तसेच त्यामुळे परिस्थितीवर झालेला परिणाम आगामी पाणीपुरवठा पाणी पुरवठा होणारा परिणाम पशुधन व चा-याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात आला. या पथकाने नंतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवारातील पिकांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी, शेतकरी यांनी, पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. येथील कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा तलावाची पाहणी केली. यानंतर या पथकाने जामखेड आणि कर्जत तालुक्यातील काही गावांची पाहणी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय