शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुष्काळी २१ गावांना दिलासा

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

रियाज सय्यद ल्ल संगमनेर ऐन दुष्काळात भीषण पाणी टंचाईमध्ये तळेगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या दुरूतीसाठी २४ लाख ७० रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे.

२५ लाख मंजूर : तळेगाव योजनेची दुरूस्ती; पूर्ण दाबाने मिळणार पाणीरियाज सय्यद ल्ल संगमनेरऐन दुष्काळात भीषण पाणी टंचाईमध्ये तळेगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या दुरूतीसाठी २४ लाख ७० रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील तहानलेल्या २१ गावांना आता पूर्ण दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.अवर्षणप्रवण क्षेत्रामुळे तळेगाव दिघेचा परिसर दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. खडकाळ, माळरान जमीन, पावसाचे अत्यल्प प्रमाण व नैसर्गिक उद्भवांची कमतरता या भागात असल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. तळेगावसह २१ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आहे. निंभाळे परिसरात प्रवरा नदीपात्रातून पाईपलाईनद्वारे पाणी उचलून आणून सदर योजनेत टाकले जाते. तेथून पुढे योजनेवर अवलंबून असलेल्या २१ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेच्या पंपींग मशिनरी गेल्या काही वर्षांपासून नादुरूस्त झाल्या आहेत. परिणामी योजनेवर अवलंबून असलेल्या २१ गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. योजनेच्या व्यवस्थापन समितीने मशिनरी दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविला. परंतु त्यास मंजुरी मिळत नसल्याने नागरिकांना पाणीपट्टी भरूनही पाणी मिळणे अशक्य झाले होते.यंदा उन्हाळ्यात तळेगाव भागात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू झाल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचीवस्तरीय स्थायी समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत तळेगाव योजनेच्या पंपींग मशिनरी बदलण्याच्या कामासाठी २४ लाख ७० हजार रूपयांच्या विशेष दुरूस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत दुरूस्तीची सर्व कामे करण्यात येणार आहेत. ही कामे टंचाई कालावधीच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा मान्यता रद्द होवू शकते. कामाची निविदा मंजूर झाल्यावर सुरूवातीला नाशिक विभागीय आयुक्त ५० टक्के निधी उपलब्ध करून देतील, तर उर्वरित निधी योजना कार्यान्वीत झाल्यावर दिला जाईल. योजनेचे काम झाल्यावर देखभाल दुरूस्ती व व्यवस्थापन संबंधित ग्रामपंचायतीस करावे लागणार आहे. दुरूस्ती होऊन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत होणार असल्याने आता योजनेवरील २१ गावांना आता पूर्ण दाबाने पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी कपातीपासून या गावांची तुर्तास सुटका झाली आहे.