शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वृक्ष संवर्धनासाठी डॉक्टर सरसावले

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे.

अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. माणसाचे जीवन अधिक सुखमय आणि आरोग्यसंपन्न व्हायचे असेल तर किमान एक झाड जगविणे काळाची गरज असल्याचा संदेश यानिमित्ताने दिला आहे.नोबल हॉस्पिटलमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त डॉ. कांडेकर यांनी रुग्णांना घरी जाताना एक रोपटे भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या ‘वृक्ष माझा सखा’ या उपक्रमाबाबत डॉ. कांडेकर म्हणाले, औषधोपचारानंतर बरे होऊन घरी जाताना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. तसाच आनंद रुग्णांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाला द्यावा. एका झाडाची एका रुग्णाने जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. दिलेले रोप घराच्या अंगणात, कॉलनीत, रस्त्याच्या कडेला यापैकी कुठेही लावावे. मात्र ते रोपटे वाढविण्याची जबाबदारी रुग्णाने घेणे आवश्यक आहे. पुढच्या वेळी रुग्णाकडून रोपट्याची माहिती घेतली जाणार आहे. रोपटे लावण्याच्या या उपक्रमात हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी असतील. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कवडे म्हणाले, जिल्ह्यात ३३ टक्के वनीकरण आवश्यक असताना केवळ ८ टक्केच वनीकरण झाले आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यामुळे माणसाचे जीवन धोक्यात आले आहे. हे सर्व टाळायचे असेल तर झाडे लावण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.या कार्यक्रमास एल अ‍ॅण्ड टीचे अरविंद पारगावकर, डॉ. सुंदर गोरे, डॉ. प्रताप पटारे, डॉ. विजय पाटील, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. दिलीप पवार, राहुल हिरे, विनय पिंपरकर, डॉ.राकेश गांधी आदी उपस्थित होते. नोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)