शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

डॉ. धोंगडे, साठे, वाघ, देऊ‌ळगावकर, पोतदार, उमप, डावखर, शेलार यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार यांना, आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप यांना देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (नेवासा) यांच्या ‘अधांतरीचे प्रश्न’ या कवितासंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (अहमदनगर) यांच्या ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीच्या वतीने जाहीर केले. कोविड संकटामुळे २०१९ च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची हे ३० वर्ष आहे.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत रविवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी प्रवरानगर येथे छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरू असल्याचे निवड समितीचे सदस्य-निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.

डॉ. धोंगडे हे साहित्याचा मूलगामी शोध घेणारा समीक्षक व भाषेचे शैली मीमांसक म्हणून ओळखले जातात. ‘गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी’ ही मकरंद साठे यांची कादंबरी वेगळ्या आशयद्रव्याने भरलेली आहे. वाघ यांच्या ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ या सैद्धांतिक ग्रंथात यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे सविस्तर विवेचन केले आहे. डावखर यांचा ‘अधांतरीचे प्रश्न’ हा काव्यसंग्रह पुरुषी व्यवस्थेत होणारे मानसिक शोषण- दमन उजागर करणारा आहे. शेलार यांचा ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ हा ग्रंथ नव संशोधकांना मार्गदर्शक ठरणारा आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पोतदार हे नव्या पिढीतील एक महत्त्वाचे नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक, आणि संशोधक आहेत. त्यांनी दरिओ फो, जॉ जाने यांची नाटके मराठीत अनुवादित केली. उमप हे आजच्या पिढीतील उमेदीचे लोककलाकार आहेत. त्यांनी शाहीर विठ्ठल उमप यांचा समृद्ध वारसा जोपासला आहे.

......................

-डॉ. रमेश धोंगडे यांना जीवनगौरव पुरस्कार

-मकरंद साठे यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

- नितीन वाघ यांना राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार

- अतुल देऊळगावकर यांना समाज प्रबोधन पुरस्कार

- आशुतोष पोतदार यांना नाट्यसेवा पुरस्कार

-नंदेश उमप यांना कलागौरव पुरस्कार

- अर्चना डावखर यांना अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

- सुधाकर शेलार यांना अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार