शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

डॉ. धोंगडे, साठे, वाघ, देऊ‌ळगावकर, पोतदार, उमप, डावखर, शेलार यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार यांना, आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप यांना देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (नेवासा) यांच्या ‘अधांतरीचे प्रश्न’ या कवितासंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (अहमदनगर) यांच्या ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीच्या वतीने जाहीर केले. कोविड संकटामुळे २०१९ च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची हे ३० वर्ष आहे.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत रविवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी प्रवरानगर येथे छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरू असल्याचे निवड समितीचे सदस्य-निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.

डॉ. धोंगडे हे साहित्याचा मूलगामी शोध घेणारा समीक्षक व भाषेचे शैली मीमांसक म्हणून ओळखले जातात. ‘गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी’ ही मकरंद साठे यांची कादंबरी वेगळ्या आशयद्रव्याने भरलेली आहे. वाघ यांच्या ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ या सैद्धांतिक ग्रंथात यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे सविस्तर विवेचन केले आहे. डावखर यांचा ‘अधांतरीचे प्रश्न’ हा काव्यसंग्रह पुरुषी व्यवस्थेत होणारे मानसिक शोषण- दमन उजागर करणारा आहे. शेलार यांचा ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ हा ग्रंथ नव संशोधकांना मार्गदर्शक ठरणारा आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पोतदार हे नव्या पिढीतील एक महत्त्वाचे नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक, आणि संशोधक आहेत. त्यांनी दरिओ फो, जॉ जाने यांची नाटके मराठीत अनुवादित केली. उमप हे आजच्या पिढीतील उमेदीचे लोककलाकार आहेत. त्यांनी शाहीर विठ्ठल उमप यांचा समृद्ध वारसा जोपासला आहे.

......................

-डॉ. रमेश धोंगडे यांना जीवनगौरव पुरस्कार

-मकरंद साठे यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

- नितीन वाघ यांना राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार

- अतुल देऊळगावकर यांना समाज प्रबोधन पुरस्कार

- आशुतोष पोतदार यांना नाट्यसेवा पुरस्कार

-नंदेश उमप यांना कलागौरव पुरस्कार

- अर्चना डावखर यांना अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

- सुधाकर शेलार यांना अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार