शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शहरांना जोडणारी लालपरी गावाकडे फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

अहमदनगर : सध्या कोरोना रूग्णांची संख्या सुरू असली तरी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असली तरी प्रमुख ...

अहमदनगर : सध्या कोरोना रूग्णांची संख्या सुरू असली तरी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असली तरी प्रमुख शहरांना जोडणारी बससेवा सुरु आहे. शहरांना जोडणारी लालपरी गावाकडे फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होताहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रवाशी कामानिमित्ताने नियम पाळत प्रवास करत आहेत. शहरातील माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकावरून बसेस धावत आहेत.

.............

रोज ४०० बसेस

सध्या जिल्हा मुख्यालयावरुन रोज ४०० बसेस ये-जा करतात. ग्रामीण भागातील निवडक ठिकाणी आणि राज्यातील विविध भागातून तारकपूर आगारात दररोज ४०० बसची ये-जा सुरु असते.

...............

नो वेटिंग (बॉक्स)

सध्या मुंबई, पुणे, कल्याण, नाशिक, औरंगाबाद यासह विविध महत्त्वाच्या शहरासाठी बससेवा सुरु आहे. तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकावरून बससेवा सुरु आहे. मात्र आगाऊ बुकिंग व्यवस्था सुरु असली तरी कुठेही वेटिंग नाही.

रातराणी केवळ १०

सध्या तारकपूर, माळीवाडा बसस्थानकावर १० रातराणी रात्री बसेस सुरू आहेत. या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या थोड्या प्रमाणात घटली आहे. कोरोनामुळे बहुतांशी काम घरूनच सुरु असल्याने प्रवास बंद आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोक बाहेर पडत असल्याने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली आहे.

..............................

प्रतिक्रिया

सध्या गर्दीच्या ठिकाणी बसेस सुरु आहेत. ग्रामीण भागात शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात बसची संख्या कमी करण्यात आली आहे.

- विजय गिते, विभाग नियंत्रक

....................

प्रतिक्रिया

सध्या शहरांना जोडणारी बससेवा सुरु असली तरी ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महामंडळाने त्वरित ग्रामीण भागातील बससेवा सुरु करण्याची गरज आहे.

- संपत कोळेकर, प्रवासी