शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

योजनांची भीक नको, आरक्षणच हवे : आरक्षण समन्वय समिती आंदोलनावर ठाम

By अरुण वाघमोडे | Updated: August 2, 2019 15:51 IST

आधी हजार कोटी आणि आता २२ योजनांची सवलत देऊ करत सेना-भाजपाचे सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत आहे.

अरूण वाघमोडे

अहमदनगर : आधी हजार कोटी आणि आता २२ योजनांची सवलत देऊ करत सेना-भाजपाचे सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत आहे. सामाजिक न्याय आणि सत्तेतील वाटा मागण्यासाठी आमची ही सन्मानाची लढाई आहे. सरकार मात्र या लढ्याला दारिद्र्य निर्मूलनाचे स्वरुप देऊ पाहत आहे. समाजाला योजनांची भीक नको तर पूर्णत: आरक्षणच हवे आहे. त्यासाठी आता अंतिम संघर्षाला प्रारंभ झाला आहे, असा इशारा धनगर आरक्षण समन्वय समितीसह समाजातील नेत्यांनी दिला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आदिवासी समाजाला लागू असलेल्या २२ योजनांचा धनगर समाजाला लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली. सरकारच्या या घोषणेवर धनगर समाजातील राज्यभरातील प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ९ आॅगस्ट रोजी पंढरपूर येथे आंदोलनावर ठाम असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून, आंदोलनापासून समाजाचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.घटनेने दिलेले हक्काचे आदिवासी आरक्षण लागू करावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. फसव्या योजना जाहीर करून सेना-भाजपाचे सरकार समाजाची दिशाभूल करत आहे. निधी अथवा योजना द्याव्यात अशी आमची मागणी नाही. येत्या काही दिवसांत विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्याआधी आरक्षणाचा विषय बासनात बांधण्याचा सरकारचा हा आटापिटा आहे. याची किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचे यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी सांगितले.आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना धनगरांसाठी लागू करून धनगर समाज हा आदिवासीच आहे, हे सरकारने मान्य केले आहे. असे असताना योजनांचे गाजर दाखविण्यापेक्षा सरकारने थेट आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्टपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. सरकार आमचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. समाज मात्र आता माघार घेणार नाही़, असे मत आरक्षण समितीचे राज्य समन्वयक पांडुरंग मेरगळ यांनी मांडले.मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय धनगर आरक्षणाचा मार्गी लावू असे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. सरकारने मात्र संशोधनासाठी टिस संस्थेची नेमणूक करून हा विषय प्रलंबित ठेवला. टिसचा अहवाल येऊनही अनेक महिने उलटले आहेत. हा अहवाल समाजासाठी खुला करण्यात आलेला नाही. योजनांच्या नावाखाली आरक्षणाचा लढा दडपण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे मत आरक्षण समितीचे सदस्य भगवानराव ज-हाड यांनी व्यक्त केले.घटनेने दिलेल्या आरक्षणासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून धनगर समाज संघर्ष करत आहे. कोणत्याच सरकारने या मागणीची दखल घेतली नाही. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावरील हक्कांपासून हा समाज वंचित राहिला आहे. पाच वर्षांत सर्व सोपस्कार पूर्ण करून भाजपा सरकार आरक्षण लागू करेल अशी अपेक्षा असताना या सरकारने मात्र आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही़, असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय