शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचात शेतक-यांना न्याय मिळतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:43 IST

बियाणे बोगस निघाल्यानंतर शेतकºयाच्या मशागतीचा खर्च, वेळ, हंगाम वाया जातो त्याचे काय? हा मुद्दा कायम राहतो. अशी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच हा एकमेव पर्याय शेतकºयांसमोर आहे. पण तेथे तरी शेतकºयाला वेळेत न्याय मिळतो का? 

काळ्या मातीत मातीत / सुधीर लंके

------------------राज्यात अनेक भागात सोयाबीन, बाजरीचे बियाणे बोगस निघाले अशा तक्रारी आहेत. नगर जिल्ह्यातही असे प्रकार घडले. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकºयांची मागणी आहे. सरकारने बियाणे कंपन्यांवर कारवाईची घोषणा केली आहे. काही ठिकाणी कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही ठिकाणी कंपन्यांनी तातडीने शेतकºयांना बियाणे बदलून देत प्रकरण निपटले. मात्र, बियाणे बोगस निघाल्यानंतर शेतकºयाच्या मशागतीचा खर्च, वेळ, हंगाम वाया जातो त्याचे काय? हा मुद्दा कायम राहतो. अशी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच हा एकमेव पर्याय शेतकºयांसमोर आहे. पण तेथे तरी शेतकºयाला वेळेत न्याय मिळतो का? 

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील संतोष कुदळे या शेतकºयाची कहाणी त्यादृष्टीने प्रातिनिधीक आहे. त्यांच्या फसवणुकीची तक्रार सन २०१६ मधील आहे. कुदळे यांनी महाबीज कंपनीकडून त्यावेळी सोयाबीनच्या बियाणांची खरेदी केली. साधारणपणे दहा ते बारा एकरावर त्यांनी पेरा केला. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत त्यांनी हे बियाणे घेतले. मोसम पाहून पेरणी केली आणि सोयाबीन तर्र उतरून येईल याची वाट पाहू लागले. गावातील रवी कसार, विलास वाघ हे अन्य शेतकरी, तसेच तालुक्यातील खोकर, पढेगाव, राहाता तालुक्यातील हनुमंतगाव, वाकडी येथील शेतकºयांनीही त्याच लॉटमधील महाबीजच्या बियाणाची खरेदी केली होती. 

पेरणीनंतर पंधरा दिवस उलटले तरीही बियाणांचा उतार झाला नाही. गडबडून गेलेल्या संतोष यांनी त्या लॉटमधील बियाणे घेणाºया इतर सर्व शेतकºयांकडून माहिती घेतली. त्यांच्या बाबतीतही असेच घडले. कुणाच्या बियाणाचा उतार झाला नाही. अखेर पंधरा वीस दिवसानंतर या सर्व शेतकºयांनी तालुका कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी अधिकाºयांनी पाहणी करुन बियाणे खराब प्रतीचे असल्याचा अहवाल दिला. पेरणी केलेल्या बियाणातील जे थोडे बियाणे घरी काढून ठेवले होते, ते शेतकºयांनी तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्य तपासणीतही बियाणे निकृष्ट आढळले. त्यानंतर पीडित शेतकºयांनी नगर येथे ग्राहक मंचात नुकसानीचे दावे दाखल केले. 

ग्राहक मंचात या प्रकरणी अद्याप सुनावणी सुरू आहे. अनेक सुनावण्याही झाल्या. महाबीज कंपनीने तेथे बियाणे आपले नव्हते तर ते कृषी विद्यापीठाने उत्पादीत केले होते, आम्ही केवळ वितरण केले असा दावा केला. विद्यापीठाने सांगितले की आम्ही उत्पादित केलेले बियाणे चांगले होते. जबाबदारी कुणीच स्वीकारलेली नाही. विद्यापीठ सरकारी, महाबीज कंपनी शासनाशी संबंधित आणि बियाणे निकृष्ट ठरविणारा कृषी विभागही शासनाचा. ग्राहक मंचात हेलपाटे मात्र शेतकरी मारतो आहे. अशी कैफियत अनेक शेतकºयांची आहे. ग्राहक मंचात तक्रार ९० दिवसात निकाली निघावी अशा सूचना आहेत. मात्र, तसे क्वचितच होते. तारीख पे तारीख पडत राहते. बºयाचदा कंपन्यांचे वकील तारखा वाढवून घेतात. म्हणणे मांडायला उशीर करतात. शेतकरी स्वखर्चाने हेलपाटे मारत बसतो. तारखा वाढतात तसा त्याचा लढाईचा खर्च वाढत जातो. शेतकºयाला थकविण्यासाठी कंपन्या मुद्दामहून तारखा वाढवून घेतात व न्यायालयही ते मान्य करते. यात काही शेतकरी न्यायावाचूनच मरतात. निकाल विरोधात गेला तर त्याला आभाळ कोसळल्यागत होते. वास्तविकत: बियाणे निकृष्ट ठरविणारा कृषी विभागाचा अहवाल हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. कारण या समितीत कृषी विभाग, विद्यापीठ, बियाणे कंपनी, कृषी सेवा केंद्र, शेतकरी या सर्वांचे प्रतिनिधी असतात. या अहवालानंतर फारसे पुरावे जमवायचे नसतात. असे असतानाही या दाव्यांमध्ये चार-चार वर्षे तारीख पे तारीख कशासाठी? हे उलगडलेले नाही.

च्ग्राहक मंचामध्ये शेतकºयांच्या वतीने बाजू मांडणाºया अ‍ॅड. शाम असावा यांनी या खटल्याबाबत ‘लोकमत’ कडे वस्तुस्थिती मांडली. ते म्हणतात, मुळात कृषी विभाग सदोष बियाणांचे पंचनामे गांभीर्याने करत नाही. पंचनाम्यावेळी छायाचित्रे काढून चित्रीकरण करायला हवे. कंपन्यांकडील कागदपत्रे, बियाणांचा बॅच क्रमांक, पेरणीची तारीख, तत्कालीन शेतातील स्थिती यातील तांत्रिक मुद्दे पंचनाम्यात नमूद करायला हवेत. मात्र असे होत नाही. पीडित शेतकºयांचे गट नंबर बदलून सरसकट सारखेच अहवाल सादर करुन पंचनामे उरकले जातात. ज्याचा कंपन्या न्यायालयात गैरफायदा घेतात. कंपनीकडून बियाणांच्या उत्कृष्टतेचे जे शास्त्रीय दावे केले जातात, ते मुद्दे पंचनान्यात समाविष्ट केले जात नाहीत.

--------------

स्वतंत्र न्याययंत्रणा नाही

च्सहकार, कामगार, उद्योग, प्रशासन, पर्यावरण या सर्व विभागांसाठी स्वतंत्र न्यायालये निर्माण झाली आहेत. कृषी क्षेत्र मोठे असले तरी कृषीच्या तंट्यांसाठी मात्र स्वतंत्र न्यायालय नाही. त्यामुळे आहे त्याच न्यायालयांकडे शेतकºयांना दाद मागावी लागते. या न्यायालयांसमोर दाव्यांचा जो ढिगारा आहे त्यात शेतकºयांचा न्यायही दबून जातो.  

-------------

शेतकºयांसाठी हवा नवा कायदा 

च्बियाणे बोगस निघाले तर शेतकºयाला तत्काळ नुकसानभरपाई देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. काही कंपन्या केवळ शेतकºयाला बियाणे बदलून देतात किंवा बियाण्याचे पैसे परत करतात. मात्र, शेतकºयाला मशागतीचा खर्च व इतर भरपाई हवी असेल तर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचातच जावे लागते. जेथे शेतकºयाला स्वत: आर्थिक खर्च करुन लढावे लागते. वास्तविकत: बियाणाची उगवण न झाल्यास कृषी विभागाची तालुका बियाणे तक्रार निवारण समिती शेताची पाहणी करुन अहवाल देते. या अहवालाच्या आधारे शासनानेच शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीला आदेश करायला हवा. याबाबत तक्रार असेल तर कंपनी न्यायालयात दाद मागू शकते. ग्राहक मंचाशिवाय नुकसान भरपाई मिळू शकणार नसेल तर मग शेतकºयांच्या वतीने कृषी विभागाने हे दावे ग्राहक मंचात दाखल करावे व निकालासाठी ग्राहक मंचाला स्पष्ट कालमर्यादा ठरवून द्यावी. त्यासाठी सुधारित कायदा हवा. आजचा कायदा हा कंपन्यांऐवजी शेतकºयाच्या बाजूचा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर