शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:56 IST

कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले.

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले. या अधिवेशनाचे शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपले काम करताना क्षमता सिद्ध करावी. चांगल्या कामात पाठबळ दिल्यास कामे सुलभ होतात, असे सांगून प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना वेळेत वीज देण्याची सूचना केली. महाराष्ट्रातील सर्व खात्यांना लोकसेवक बिल लागू झाले असेल तर ऊर्जा खात्याच्या महावितरणलाही लोकसेवकाचे बिल लागू झाले पाहिजे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. सोशल मीडियातून वीज विषयक तक्रारी सकारात्मक घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहावे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील अभियंता व अधिकारी उपस्थित होते.मुख्यालयाचे ठिकाणचा निर्णयअनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या विविध खात्यांच्या प्रमुखांना व अधिकºयांना मोठ्या जिल्ह्यात जाणं, सेवा देणं जिकिरीच काम होत. जनभावनेनुसार जिल्ह्याचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्या दृष्टीने राज्यसरकार प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे, की संगमनेर या वरून वाद होत होते. मात्र ते वाद तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने होत होते. आता सरकार बदललेले आहे. त्यामुळे हेडक्वॉर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्यसरकार घेईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.