शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:44 IST

दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना जातीचे,नॉनक्रिमीलेअर, ओबीसी दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दररोज सेतू केंद्रात हेलपाटे मारून आमचा दाखला झाला का? असे प्रश्न विचारत आहेत. दाखल्यांच्या या घोळामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत.दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखले गोळा करण्यात मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळणारे दाखले पंधरा दिवसांपासून न मिळाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. एक जूनपासून सेतू केंद्राला ‘आॅन लाईन सबमिशन करा’ असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेतू केंद्राने आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आजतागायत हे दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक सेतू केंद्रात दररोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. रहिवाशी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, शेतकरी, ३३ टक्के महिला आरक्षण असे दाखले तहसीलमधून मिळतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयात ‘थंब’ द्यायला अधिकारी नसल्यामुळे हे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. परंतु बुधवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ‘थंब’ दिल्यानंतर गुरूवारपासून हे दाखले मिळायला सुरूवात झाली आहे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने पालकांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. त्यातच दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात येणाºया दाखल्यांसाठी सरकारने दर निश्चित केले आहे. मात्र काही ई-सेवा केंद्रे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पाथर्डी-नगर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सध्या फक्त दाखल्यांचीच चर्चा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर