शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:44 IST

दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना जातीचे,नॉनक्रिमीलेअर, ओबीसी दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दररोज सेतू केंद्रात हेलपाटे मारून आमचा दाखला झाला का? असे प्रश्न विचारत आहेत. दाखल्यांच्या या घोळामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत.दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखले गोळा करण्यात मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळणारे दाखले पंधरा दिवसांपासून न मिळाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. एक जूनपासून सेतू केंद्राला ‘आॅन लाईन सबमिशन करा’ असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेतू केंद्राने आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आजतागायत हे दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक सेतू केंद्रात दररोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. रहिवाशी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, शेतकरी, ३३ टक्के महिला आरक्षण असे दाखले तहसीलमधून मिळतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयात ‘थंब’ द्यायला अधिकारी नसल्यामुळे हे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. परंतु बुधवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ‘थंब’ दिल्यानंतर गुरूवारपासून हे दाखले मिळायला सुरूवात झाली आहे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने पालकांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. त्यातच दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात येणाºया दाखल्यांसाठी सरकारने दर निश्चित केले आहे. मात्र काही ई-सेवा केंद्रे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पाथर्डी-नगर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सध्या फक्त दाखल्यांचीच चर्चा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर