शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:44 IST

दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना जातीचे,नॉनक्रिमीलेअर, ओबीसी दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दररोज सेतू केंद्रात हेलपाटे मारून आमचा दाखला झाला का? असे प्रश्न विचारत आहेत. दाखल्यांच्या या घोळामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत.दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखले गोळा करण्यात मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळणारे दाखले पंधरा दिवसांपासून न मिळाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. एक जूनपासून सेतू केंद्राला ‘आॅन लाईन सबमिशन करा’ असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेतू केंद्राने आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आजतागायत हे दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक सेतू केंद्रात दररोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. रहिवाशी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, शेतकरी, ३३ टक्के महिला आरक्षण असे दाखले तहसीलमधून मिळतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयात ‘थंब’ द्यायला अधिकारी नसल्यामुळे हे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. परंतु बुधवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ‘थंब’ दिल्यानंतर गुरूवारपासून हे दाखले मिळायला सुरूवात झाली आहे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने पालकांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. त्यातच दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात येणाºया दाखल्यांसाठी सरकारने दर निश्चित केले आहे. मात्र काही ई-सेवा केंद्रे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पाथर्डी-नगर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सध्या फक्त दाखल्यांचीच चर्चा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर