शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:36 IST

केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देकेडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली गुन्ह्याबाबत पोलिसांचे घूमजावअद्याप आरोपींना अटक नाहीपोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

अहमदनगर : केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी पोलिसांनी हे कलम स्वत:च वगळले. सरकारच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी हे कलम वगळल्याची चर्चा सुरु झाली आहे.केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अद्याप या आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, या गुन्ह्यातील सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे कलम ३०८ वगळले आहे. त्याऐवजी ‘दगडफेक आणि दुखापत’ (कलम ३२४, ३३६, ३३७) असा उल्लेख असणारी कलमे वाढविण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसांत शिवसैनिकांचे अटकसत्र सुरु करु, असे पोलीस सांगत आहेत. केडगाव येथे शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी जो गोंधळ घातला त्याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी स्वत: फिर्याद दिलेली आहे.केडगाव येथे राठोड यांसह शिवसैनिकांनी शासकीय वाहनांवर दगडफेक केली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नगर-पुणे रस्त्यावर दगडफेक करुन प्रवास करणाऱ्यांच्या जीवितास धोका होईल, असे वर्तन केले. नागरिकांच्या घरावरदगडफेक केली, असे या फिर्यादीत म्हटले होते.पोलीस म्हणतात गंभीर दुखापत नाहीपोलिसांनी शिवसैनिकांवरील आरोपांची तपासणी केली. केडगाव येथे झालेल्या दंगलीनंतर कोणालाही गंभीर दुखापत आढळली नसल्याने सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे ३०८ कलम वगळण्यात आल्याचा दावा, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केला आहे. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्यानंतर त्यांच्याविरोधातही ३०८ कलम लावण्यात आले आहे. हे कलम मात्र कायम आहे. त्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी अडचणी येत आहेत.पोलिसांनी राजकीय दबावातून शिवसैनिकांवरील कलम मागे घेतले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.ओंकार गिरवलेचा जामीन फेटाळलाओंकार कैलास गिरवले हे पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांचे वडील कैलास गिरवले हेही आरोपी होते. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात ते पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जाताच त्यांना दारुबंदी कायद्यांतर्गत दुसºया गुन्ह्यात अटक करण्यात आली. या अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोेलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यांचा मुलगा ओंकार याने आपल्या जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, हा अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला.

  • पोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

शिवसैनिकांविरोधातील कलम मागे घेतले आहे का? असा प्रश्न गुरुवारी पत्रकारांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना केला. मात्र, त्यांनी याबाबत उत्तर दिले नाही. आजची पत्रकार परिषद जामखेड हत्याकांडाबाबत असल्याने याबाबत नंतर बोलू असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv SenaशिवसेनाAnil Rathodअनिल राठोडPoliceपोलिस