शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:36 IST

केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देकेडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली गुन्ह्याबाबत पोलिसांचे घूमजावअद्याप आरोपींना अटक नाहीपोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

अहमदनगर : केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी पोलिसांनी हे कलम स्वत:च वगळले. सरकारच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी हे कलम वगळल्याची चर्चा सुरु झाली आहे.केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अद्याप या आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, या गुन्ह्यातील सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे कलम ३०८ वगळले आहे. त्याऐवजी ‘दगडफेक आणि दुखापत’ (कलम ३२४, ३३६, ३३७) असा उल्लेख असणारी कलमे वाढविण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसांत शिवसैनिकांचे अटकसत्र सुरु करु, असे पोलीस सांगत आहेत. केडगाव येथे शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी जो गोंधळ घातला त्याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी स्वत: फिर्याद दिलेली आहे.केडगाव येथे राठोड यांसह शिवसैनिकांनी शासकीय वाहनांवर दगडफेक केली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नगर-पुणे रस्त्यावर दगडफेक करुन प्रवास करणाऱ्यांच्या जीवितास धोका होईल, असे वर्तन केले. नागरिकांच्या घरावरदगडफेक केली, असे या फिर्यादीत म्हटले होते.पोलीस म्हणतात गंभीर दुखापत नाहीपोलिसांनी शिवसैनिकांवरील आरोपांची तपासणी केली. केडगाव येथे झालेल्या दंगलीनंतर कोणालाही गंभीर दुखापत आढळली नसल्याने सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे ३०८ कलम वगळण्यात आल्याचा दावा, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केला आहे. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्यानंतर त्यांच्याविरोधातही ३०८ कलम लावण्यात आले आहे. हे कलम मात्र कायम आहे. त्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी अडचणी येत आहेत.पोलिसांनी राजकीय दबावातून शिवसैनिकांवरील कलम मागे घेतले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.ओंकार गिरवलेचा जामीन फेटाळलाओंकार कैलास गिरवले हे पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांचे वडील कैलास गिरवले हेही आरोपी होते. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात ते पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जाताच त्यांना दारुबंदी कायद्यांतर्गत दुसºया गुन्ह्यात अटक करण्यात आली. या अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोेलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यांचा मुलगा ओंकार याने आपल्या जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, हा अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला.

  • पोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

शिवसैनिकांविरोधातील कलम मागे घेतले आहे का? असा प्रश्न गुरुवारी पत्रकारांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना केला. मात्र, त्यांनी याबाबत उत्तर दिले नाही. आजची पत्रकार परिषद जामखेड हत्याकांडाबाबत असल्याने याबाबत नंतर बोलू असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv SenaशिवसेनाAnil Rathodअनिल राठोडPoliceपोलिस