शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारीला लागा- दिलीप वळसे; श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 18:38 IST

गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले.

श्रीगोंदा : गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले.कुकडी साखर कारखान्यावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वळसे म्हणाले, माझ्यावर नगर, जळगाव जिल्ह्यांची जबाबदारी आहे. या दोन जिल्ह्यांत किमान १० जागा विधानसभेला मिळाल्या की राज्यात राष्ट्रवादीचे सरकार शंभर टक्के येईल. त्यासाठी आपण व्यूहरचना आखणार आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे मी तुम्हाला जागे करीत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले म्हणाले, भाजपाने शेतकरी मोडला आता सहकाराच्या मागे लागले आहेत. साखर कामगारांनाही आपल्या हितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. सध्या भाजपाच्या विरोधात लाट आली आहे. त्यामुळे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप विजयी होतील. आ. जगताप म्हणाले, मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून शेतकºयांचा अपेक्षाभंग केला. आता या सरकारला पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत संधी येणार आहे. राष्ट्रवादीला एक नंबरचे मतदान होईल.राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुश्री गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सचिन जगताप, सबाजी गायकवाड, विठ्ठलराव काकडे, अशोक बाबर, मीना आढाव, दीपक भोसले, कल्याणी लोखंडे, बाळासाहेब उगले, विश्वास थोरात, अख्तारभाई शेख, हृषीकेश गायकवाड, सुभाष काळाणे उपस्थित होते.

श्रीगोंद्यात दादा एके दादा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल जगताप यांचे नाव सोडून दुसरे नाव पक्षासमोर नाही. आ. जगताप यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सभागृह बंद पाडले होते. त्यामुळे श्रीगोंद्यात ‘राहुलदादा एके राहुल दादा’ असा उल्लेख दिलीप वळसे यांनी केला. त्यावर एकच हशा पिकला.

...तर जेलमध्ये पाठवू

श्रीगोंदा तालुक्यातील ऊस ठेवून नागवडे अथवा कुकडी साखर कारखान्याने बाहेरून कमी भावात ऊस आणला नाही, परंतु नागवडे व आमच्यावर कोणी चुकीचे आरोप केल्यास अब्रू नुकसानभरपाईचा दावा दाखल करून जेलमध्ये पाठवू, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाNCPराष्ट्रवादी काँग्रेस