शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:15 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देग्राहकांची पिळवणूक नोकरदार, विमाधारक, कामगार ग्राहकांना त्रास

अहमदनगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या बँकांचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखा कार्यालयांमध्ये देखील स्वीकारले जात नाहीत. त्याचा त्रास नोकरदार, कामगार, विमा पॉलिसीधारक व सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

रिझर्व्ह बँकेने चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) ही नवीन प्रणाली लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने अगोदरच याबाबत निर्देश देऊनही सहकारी व इतर काही बँकांनी याबाबतची पूर्वतयारी केली नव्हती. १ एप्रिलपासून सी. टी. एस. प्रणालीची राष्ट्रीयीकृत बँकांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. या प्रणालीनुसार ग्राहकाने दिलेला धनादेश (चेक) पूर्वीप्रमाणे टपालातून (मॅन्युअली) एका शाखेतून दुसऱ्या शाखेस पाठविण्याऐवजी ज्या बँकेत धनादेश भरला, त्याच बँकेतून तो स्कॅन होऊन ज्या शाखेच्या नावे धनादेश असेल, त्या शाखेत तो त्याचक्षणाला संगणकीय यंत्रणेमार्फत पाठवून त्याची काही क्षणातच पडताळणी केली जाते. पडताळणी होताच, हा धनादेश वटविला जातो. या पद्धतीनुसार धनादेश वटविण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे धनादेश तयार करण्यात आले आहेत. ग्राहकाचे नाव छापूनच त्याला धनादेश पुस्तिका दिल्या जात आहेत. हा धनादेश स्कॅन करून बँकेचा कोड व इतर तपशीलासह रिझर्व्ह बँक व संबंधित बँकेत संगणकीय यंत्रणेद्वारे तो पोहोचून त्याची वर्गवारी, पडताळणी झाल्यानंतरच तो ताबडतोब वटविला जात आहे. सीटीएस प्रणालीनुसार एमआयसीआर धनादेशाद्वारेच व्यवहार सुरू झाल्याने जुने धनादेश बाद झाले आहेत.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अगोदरपासूनच कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब सुरू केलेला आहे. १५ दिवसांपासून बँकेत सीटीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संगमनेर, कोपरगाव, राहुरीसह बºयाच ठिकाणी ही प्रणाली सुरू केली आहे. काही शाखांमध्ये लवकरच ती सुरू होणार आहे. सुरुवातच असल्याने काही प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. येत्या काही दिवसात या प्रणालीनुसार व्यवहार सुरळीत होतील. जिल्हा बँकेच्या २८६ शाखा आहेत. त्या सर्वांना नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या प्रणालीनुसार नवीन धनादेश छपाईची स्वतंत्रण यंत्रणा जिल्हा बँकेच्या मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे.-रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक, अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक