शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 14:07 IST

अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.

अकोले : अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ अकोले येथील  बाजारतळावर रविवारी झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासींसाठी आम्ही केलेल्या कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी  भलत्याच तालुक्यात विकास केला. त्याचे शुक्लकाष्ट मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले. त्यांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.आदिवासींच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. रोजगार हमी कायदा, मंडल आयोग अंमलबजावणी, शेतक-यांना कर्ज माफी ही कामे मी मुख्यमंत्री असताना केली. राज्यातील औद्योगिक वसाहतींना चालना देत बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करताना राज्य देशात एक नंबर वर नेऊन ठेवले. गेल्या पाच वर्षात राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली, असा आरोप करीत राज्यात सत्ता बदल करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी दशरथ सावंत, डॉ अजित नवले, विनय सावंत, अशोक भांगरे, अमित भांगरे, डॉ. लहामटे यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019