शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 14:07 IST

अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.

अकोले : अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ अकोले येथील  बाजारतळावर रविवारी झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासींसाठी आम्ही केलेल्या कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी  भलत्याच तालुक्यात विकास केला. त्याचे शुक्लकाष्ट मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले. त्यांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.आदिवासींच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. रोजगार हमी कायदा, मंडल आयोग अंमलबजावणी, शेतक-यांना कर्ज माफी ही कामे मी मुख्यमंत्री असताना केली. राज्यातील औद्योगिक वसाहतींना चालना देत बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करताना राज्य देशात एक नंबर वर नेऊन ठेवले. गेल्या पाच वर्षात राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली, असा आरोप करीत राज्यात सत्ता बदल करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी दशरथ सावंत, डॉ अजित नवले, विनय सावंत, अशोक भांगरे, अमित भांगरे, डॉ. लहामटे यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019