शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीरगाव येथे कालवा फोडून धुळवड साजरी; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:11 IST

वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

गणोरे : वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. हा संतापजनक प्रकार उशिराने शनिवारी सकाळी जलसंपदा विभागाच्या सिंचन यंत्रणेला समजला.कालव्याला मोठ्या प्रमाणात पडलेले भगदाड बुजविण्यासाठी जेसीबी यंत्राचा शोध व पाण्याच्या नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर विस्कळीत झालेले पाण्याचे आवर्तन दुपारी पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी गावक-यांनी बघ्यांची भूमिका पार पाडली. कालव्याच्या पाण्याने गावतळे व बंधारे तुडुंब भरले आहेत. गावक-यांच्या एका दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचे दिसून येत असले, तरी पाण्याचे मोठे नुकसान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक आहे. वीरगाव या एकाच ठिकाणी सातत्याने प्रत्येक आवर्तनात कालवा फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनीही अनेकदा गंभीर घटनांबद्दल डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने कारवाईचा धाक उरला नसल्याचे दिसते आहे.अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या पाण्याचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले आहे. उजव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ६८ क्यूसेकची असून, पूर्ण क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, येत्या २८ फेब्रुवारी रोजी रब्बी हंगामातील नियमानुसार आवर्तन चालू ठेवण्याचाच कालावधी संपला आहे. त्यानंतर १ मार्चपासून सुरू होणा-या उन्हाळी हंगामातही आवर्तन रब्बीच्या नावाने सलग सुरू राहणार असल्याची चिन्हे आहेत. धरणात सध्या सुमारे ५५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. लाभक्षेत्रात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले