शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

धामणगाव आवारी परिसरात बिबट्या ठोकतोय डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

धामणगाव आवारी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. गावाला लागून असलेले वनविभागाचे डोंगर, उसाच्या व इतर पिकांचा आश्रयाने हे बिबटे ...

धामणगाव आवारी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. गावाला लागून असलेले वनविभागाचे डोंगर, उसाच्या व इतर पिकांचा आश्रयाने हे बिबटे रात्री नागरी वस्तीकडे शिकारीसाठी येतात हे अनेकांनी पाहिले आहे. या परिसरात नेमके किती बिबटे आहेत हे जरी सांगता येत नसले तरी या परिसरात वेगवेगळ्या भागात रात्री थेट जनावरांच्या गोठ्यात घुसून बिबट्यांनी पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांनी थेट येथील दौलत देशमुख यांच्या तब्बल पाच शेळ्यांच्या नरडीचा घोट घेत त्या ठार केल्या होत्या, तर नवनाथ दत्तात्रय आवारी यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एक शेळी ठार, तर एक गंभीर जखमी केली होती. अशा अनेक घटना घडत असून, काही घटना समोरही येत नाहीत. अजूनही बिबट्याच्या पशुधनावरील हल्ल्याचे सावट सुरूच आहे.

या भागात बिबट्याकडून कुत्री, कोंबड्या, वासरे ठार होण्याच्या घटना आता नेहमीच्या झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या भागात वाढत चाललेल्या बिबट्यांच्या हल्ल्याबाबत वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शिकारीसाठी भटकणाऱ्या या बिबट्यांकडून भविष्यात लहान मुलांवरही हल्ले होऊ शकतात, अशी भीतीही आता नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

….…………..

पिंजऱ्याकडे फिरकेनात बिबटे

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली मात्र केवळ एका ठिकाणी पिंजराही लावण्यात आला. त्यात सावज म्हणून शिकारही ठेवण्यात आली, मात्र बिबट्या तिकडे फिरकतही नाही.

….……..

बिबट्यांची संख्या वाढतेय

बिबट्यांची संख्या वाढत चालली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे कमी पडत आहेत. त्यामुळे आता निदान प्रत्येक पशुधन पालकांना आपल्या पशुधनाचे रात्री संरक्षण करण्यासाठी शासकीय अनुदानस्तरावर भक्कम व बंदिस्त गोठ्यांसारखी उपाय योजना करता येईल का? याबाबत विचार व्हायला हवा तरच बिबट्याचा हल्ल्यात वारंवार होणारे पशुधनाचे नुकसान टळेल, अशा मागणीचा सूरही आता पशुधन पालकांकडून ऐकायला मिळत आहे.