शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेत अडकले बेलापूरचे भक्त; रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटला

By शिवाजी पवार | Updated: July 11, 2023 15:10 IST

बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह ५५ जण अमरनाथ यात्रेला नुकतेच गेले होते.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अमरनाथ यात्रेला गेलेले तालुक्यातील बेलापूर येथील ५५ जण रस्ता खचल्यामुळे अनंतनाग जिल्ह्यामध्ये अडकले आहेत. प्रशासनाने त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. मात्र हजारो लोक तिथे अडकल्यामुळे जम्मूपर्यंतचा आपला प्रवासह₹ कठीण असल्याची माहिती या लोकांनी लोकमतला दिली.

बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह ५५ जण अमरनाथ यात्रेला नुकतेच गेले होते. मात्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे त्यांची यात्रा पूर्ण होऊ शकली नाही. अनंत नाग जिल्ह्यातील एका भागामध्ये रस्ता खचला आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. तेथील प्रशासनाच्या एका छावणीमध्ये हे सर्व जण थांबलेले आहेत. त्यांची तेथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, हजारो लोक यात्रेत अडकल्यामुळे अनंतनाग येथून जम्मूपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे. एकाच वेळेस सर्व यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे काम सोपे नाही, अशी माहिती विजय भगत यांनी लोकमतला दिली. दिल्ली येथून सर्व यात्रेकरूंचे रेल्वे आरक्षण केले होते. मात्र आपण अजूनही अडकलेलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने दिल्ली येथून नव्याने रेल्वेची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्रा