शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

साई संस्थानवर विकासाचा दृष्टीकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा यांच्यासारखी विकासाची मोठी दृष्टी असलेले लोक नियुक्त करावेत, अशी सूचना भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.

श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी खासदार डॉ. विखे बोलत होते. संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारने या निवडीपूर्वी संस्थानच्या कायद्यात काही दुरूस्त्या केल्या आहेत. नवीन मंडळाची नियुक्तीसाठी सरकारने न्यायालयाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळविली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी ही भूमिका मांडली आहे.

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तींना स्थान द्यायला हवे का, असा प्रश्न विखे यांना विचारला असता, ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असाे किंवा नसो, मात्र मोठा दृष्टीकोन असलेले लोक संस्थानवर घेतले पाहिजे. उद्योजक नीता अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रांसारखे लोक संस्थानला अधिक बळकट करू शकतील. दर्शन रांगेतील पास किंवा इतर कोणत्याही कामकाजांमध्ये ही मंडळी हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे संस्थानच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकेल. केवळ उद्योगपतीच नाही तर कायद्यातील काही तज्ज्ञ लोकांचीही संस्थानवर निवड केली तर ती स्वागतार्ह ठरेल.

..........

नव्या सहकार खात्याकडे इडीसारखे का पाहता

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने तयार करण्यात आलेल्या सहकार खात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्राने कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला की विरोध, आरोप करत सुटतात. सहकार क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले आहे. मात्र, काही मंडळींना ते दुसरे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) असल्याचा भास होतो आहे, असे डॉ. विखे म्हणाले.

------

आम्ही सहकार जगविला

राज्यात सहकारी साखर कारखानदारीची आता खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती आता थांबणार नाही. राज्यातील सरकारमधील काही नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. त्यांचा सहकाराशी संबंध नाही. आम्ही मात्र राहुरी व गणेश चालवायला घेऊन सहकार जगविण्याची भूमिका जपली, असे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.