शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानवर विकासाचा दृष्टीकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा यांच्यासारखी विकासाची मोठी दृष्टी असलेले लोक नियुक्त करावेत, अशी सूचना भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.

श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी खासदार डॉ. विखे बोलत होते. संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारने या निवडीपूर्वी संस्थानच्या कायद्यात काही दुरूस्त्या केल्या आहेत. नवीन मंडळाची नियुक्तीसाठी सरकारने न्यायालयाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळविली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी ही भूमिका मांडली आहे.

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तींना स्थान द्यायला हवे का, असा प्रश्न विखे यांना विचारला असता, ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असाे किंवा नसो, मात्र मोठा दृष्टीकोन असलेले लोक संस्थानवर घेतले पाहिजे. उद्योजक नीता अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रांसारखे लोक संस्थानला अधिक बळकट करू शकतील. दर्शन रांगेतील पास किंवा इतर कोणत्याही कामकाजांमध्ये ही मंडळी हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे संस्थानच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकेल. केवळ उद्योगपतीच नाही तर कायद्यातील काही तज्ज्ञ लोकांचीही संस्थानवर निवड केली तर ती स्वागतार्ह ठरेल.

..........

नव्या सहकार खात्याकडे इडीसारखे का पाहता

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने तयार करण्यात आलेल्या सहकार खात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्राने कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला की विरोध, आरोप करत सुटतात. सहकार क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले आहे. मात्र, काही मंडळींना ते दुसरे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) असल्याचा भास होतो आहे, असे डॉ. विखे म्हणाले.

------

आम्ही सहकार जगविला

राज्यात सहकारी साखर कारखानदारीची आता खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती आता थांबणार नाही. राज्यातील सरकारमधील काही नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. त्यांचा सहकाराशी संबंध नाही. आम्ही मात्र राहुरी व गणेश चालवायला घेऊन सहकार जगविण्याची भूमिका जपली, असे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.