शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'पुढची 15 वर्षं सत्ता आमचीच, विखेही परत येतील'; हे ऐकून सुजय विखेही हसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 17:50 IST

किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार ही पाचच नाही तर पुढील १५ वर्षे सत्तेत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही सत्तेची आशा आहे. परंतु त्यांना आशेवरच राहावे लागेल, असा टोला अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. 

अहमदनगर : किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार ही पाचच नाही तर पुढील १५ वर्षे सत्तेत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही सत्तेची आशा आहे. परंतु त्यांना आशेवरच राहावे लागेल, असा टोला अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. अहमदनगर येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत पडेल’ असे फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हणतात, असे पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले असता, त्यांनी भाजपचा समाचार घेतला. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना भाजपचेच सरकार येणार अशी पूर्ण खात्री होती. परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे आताही त्यांच्या डोक्यात रात्रं-दिवस सत्तेचेच गुºहाळ फिरत असते. त्यातून ते अशी विधाने करतात. परंतु भापजला आमचे सांगणे आहे की, महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १५ वर्षे टिकणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला.सरपंच निवडीबाबत येत्या अधिवेशनात कायदा भाजप सरकारच्या काळातील थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करून महाविकास आघाडी सरकारने सरपंच निवड सदस्यातून करण्याचा निर्णय घेतला. याचा अध्यादेश काढण्याची विनंती सरकारने राज्यपालांकडे केली होती. परंतु राज्यपालांनी ही मागणी फेटाळली, याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरपंच निवडीबाबत आम्ही कायदाच करणार आहोत. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी सांगितले. विखेही आमच्याकडे येतीलपत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते. ‘आमचे सरकार पुढील १५ वर्षे टिकेल व त्यात विखेही असतील. कारण तेही मूळचे काँग्रेसी विचारधारेचेच आहेत’, असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. या विधानाने सुजय विखे यांनाही हसू आवरले नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्रीPoliticsराजकारण