शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'पुढची 15 वर्षं सत्ता आमचीच, विखेही परत येतील'; हे ऐकून सुजय विखेही हसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 17:50 IST

किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार ही पाचच नाही तर पुढील १५ वर्षे सत्तेत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही सत्तेची आशा आहे. परंतु त्यांना आशेवरच राहावे लागेल, असा टोला अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. 

अहमदनगर : किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार ही पाचच नाही तर पुढील १५ वर्षे सत्तेत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही सत्तेची आशा आहे. परंतु त्यांना आशेवरच राहावे लागेल, असा टोला अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. अहमदनगर येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत पडेल’ असे फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हणतात, असे पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले असता, त्यांनी भाजपचा समाचार घेतला. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना भाजपचेच सरकार येणार अशी पूर्ण खात्री होती. परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे आताही त्यांच्या डोक्यात रात्रं-दिवस सत्तेचेच गुºहाळ फिरत असते. त्यातून ते अशी विधाने करतात. परंतु भापजला आमचे सांगणे आहे की, महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १५ वर्षे टिकणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला.सरपंच निवडीबाबत येत्या अधिवेशनात कायदा भाजप सरकारच्या काळातील थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करून महाविकास आघाडी सरकारने सरपंच निवड सदस्यातून करण्याचा निर्णय घेतला. याचा अध्यादेश काढण्याची विनंती सरकारने राज्यपालांकडे केली होती. परंतु राज्यपालांनी ही मागणी फेटाळली, याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरपंच निवडीबाबत आम्ही कायदाच करणार आहोत. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी सांगितले. विखेही आमच्याकडे येतीलपत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते. ‘आमचे सरकार पुढील १५ वर्षे टिकेल व त्यात विखेही असतील. कारण तेही मूळचे काँग्रेसी विचारधारेचेच आहेत’, असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. या विधानाने सुजय विखे यांनाही हसू आवरले नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्रीPoliticsराजकारण