शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विकास आघाड्या हद्दपार

By admin | Updated: July 14, 2016 01:25 IST

अहमदनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मुस्लीम काँग्रेस पार्टीसह जिल्ह्यातील १९ आघाड्यांची मान्यता बुधवारी रद्द करण्यात आली आहे़

अहमदनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मुस्लीम काँग्रेस पार्टीसह जिल्ह्यातील १९ आघाड्यांची मान्यता बुधवारी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे बहुतांश तालुक्यांतील ‘सोधा’ पक्षाला मोठा दणका बसला असून, निवडणुकीच्या तोंडावरच आघाडी स्थापन्यासाठी त्यांना पुन्हा धावाधाव करावी लागणार आहे़ जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी राजकीय सोयीसाठी ठिकठिकाणी विकास आघाड्या स्थापन केल्या़ विकास आघाडी स्थापन करून बड्या नेत्यांनी जिल्ह्यात राजकीय बस्तान बसविले़ विकास आघाड्यांचे डावपेच यशस्वी होत गेले़ त्यामुळे जिल्ह्यात विकास आघाड्यांचे एकप्रकारे पेवच फुटले होते़ मात्र, या आघाड्यांवरच आता गंडांतर आले असून, राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्ह्यातील १९ विकास आघाड्या रद्द करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला़ मान्यता रद्द करण्यामागे आयकर विवरणपत्र आणि लेखा परिक्षणाचे लेखे सादर न केल्याचे कारण आयोगाने दिले आहे़ त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वरील निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आघाड्या राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत़ निवडणुकांच्या तोंडावर विकास आघाड्यांची मान्यता रद्द झाल्याने अनेकांची गोची होणार आहे़ नगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठ पालिकांच्या निवडणुका आहेत़ आघाडी करून निवडणुका लढविण्याचे अनेकांचे मनसुबे यामुळे उधळले गेले आहेत़ (प्रतिनिधी)या विकास आघाड्यांची मान्यता रद्दनेवासा तालुका विकास आघाडी, पारनेर तालुका विकास आघाडी, राहाता तालुका विकास आघाडी, कोपरगाव तालुका विकास आघाडी, कर्जत तालुका विकास आघाडी, जामखेड तालुका विकास आघाडी, श्रीगोंदा तालुका विकास आघाडी, राहुरी तालुका विकास आघाडी, संगमनेर तालुका विकास आघाडी, श्रीरामपूर तालुका विकास आघाडी, पाथर्डी तालुका विकास आघाडी, नगर तालुका विकास आघाडी, शेवगाव तालुका विकास आघाडी, अकोले तालुका विकास आघाडी, जनसेवा विकास आघाडी, लोकसेवा विकास आघाडी, परिवर्तन समता परिषद, लोकशक्ती विकास आघाडी, जय तुळजा भवानी नवनिर्मित सेना़नगर शहरातील इंडियन मुस्लीम काँग्रेस पार्टीची मान्यता राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे़ या पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली़ परंतु आयकर विवरपण पत्र सादर केले नाही़ त्यामुळे या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे़