शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:23 IST

जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे.

आदित्य ठाकरे नगरला काय देणार?-वृत्त मालिका /

चंद्रकांत शेळके । अहमदनगर : सव्वापाचशे वर्षांपूर्वीचा ठेवा, तसेच अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला नगरचा भूईकोट किल्ला देखभाल-दुरूस्तीअभावी भग्नावस्थेत लोटला जात असून शासनाच्या उदासिनतेमुळे किल्ल्याकडे पर्यटकांचा पाय फिरकेनासा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे. आता नव्या सरकारमधील पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नगरला काय देणार? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशाहाने नगर शहर वसविण्यापूर्वी इ.स. १४९० मध्ये भूईकोट किल्ला बांधला. किल्ल्यास २२ बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात इ.स. १८३२ मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला होता. त्याचे अवशेष अजूनही किल्ल्यात पहायला मिळतात. वर्तुळाकार असलेला हा किल्ला अंतर्गत ६० एकरवर पसरलेला असून खंदकासहित किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८० एकरपेक्षा जास्त आहे.मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. १९४२च्या चले जाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना १९४५ पर्यंत ब्रिटिशांनी याच किल्ल्यात स्थानबध्द केले होते. नेहरुंनी या किल्ल्यातच ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. असा सुमारे सव्वापाचशे वर्षांचा नगरचा इतिहास या किल्ल्याशी जोडला गेलेला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गड-किल्ले दुर्गम भागात व शहरापासून कोसो दूर असूनही पर्यटक तेथे आवर्जून येतात. मात्र नगरचा किल्ला अगदी शहरात असूनही केवळ तेथील सोयी-सुविधांअभावी पर्यटकांच्या नजरेत भरत नाही. दरम्यान, किल्ल्याच्या सुशोभि-करणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ४ कोटी ९३ लाख रूपयांची मागणी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे केली. पहिल्या टप्प्यात ५० लाख रूपये प्राप्त झाले. त्यातून प्रशासनाने किल्ल्याभोवतीची, तसेच आतील झाडेझुडपे काढली. तसेच जॉगिंग ट्रॅकचे काम केले.  सात महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी किल्ल्यामध्ये बैठक घेऊन दीड कोटी रूपये देण्याचे मान्य केले होते. आता सरकार बदलले, मात्र तो निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने पर्यटन विभागाकडे निधीची मागणी केली, मात्र अद्याप शासन निधी देण्याबाबत उदासिन आहे. किल्ला सैन्यदलाकडे सन १९४७ पासून आजतागायत भूईकोट किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात आहे. सध्या किल्ल्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा वेळेत प्रवेश मिळतो. त्यासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. किल्ल्यात प्रवेश खुला असला तरी राष्ट्रीय सण वगळता किल्ल्याकडे पर्यटक पाठच फिरवतात. 

किल्ल्याच्या सर्व बाजूने परिसर स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जॉगिंग ट्रॅक व वृक्षारोपण करण्याचे कामही केले आहे. परंतु किल्ल्याची उर्वरित डागडुजी व इतर कामे होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तो शासनाकडून अद्याप प्राप्त झालेला नाही. किल्ल्याची प्रस्तावित सर्व कामे झाल्यानंतर किल्ल्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.        भूईकोट किल्ल्याला सव्वापाचशे वर्षांचा इतिहास आहे. पर्यटनाच्या दृष्टीने किल्ला विकसित केला तर पर्यटकांची रांग लागेल एवढे वैभव भूईकोटचे आहे. भूईकोटसह जिल्ह्यातील इतरही धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास झाला तर नगरची वेगळी ओळख राज्य व देशभर निर्माण होईल, असे इतिहासप्रेमी जयंत येलूलकर यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरhistoryइतिहासFortगड